AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : कॅप्टन सूर्यकुमारकडून या दोघांना विजयाचं श्रेय, म्हणाला….

India vs Bangladesh 2nd T20i Post Match Presentation: टीम इंडियाने नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात बांगलादेशवर 86 धावांनी मात करत मालिकेवर आपलं नाव कोरलं.

IND vs BAN : कॅप्टन सूर्यकुमारकडून या दोघांना विजयाचं श्रेय, म्हणाला....
suryakumar yadav post match presentation ind vs ban 2nd t20i
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 09, 2024 | 11:47 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20I सामन्यात बांगलादेशवर 86 धावांनी मात करत मालिका जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाने नितीश रेड्डी 74 आणि रिंकू सिंह याच्या 53 धावांच्या जोरावर 221 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 222 धावांचं आव्हान मिळालं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावांपर्यंतच मजल मारता आली.बांगलादेशकडून एकट्या अनुभवी महमुदुल्लाह याचा अपवाद वगळता एकालाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. महमुदुल्लाहने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून नितीश रेड्डी याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. नितीश आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकट्स घेतल्या. तर इतर 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा हा या 2024 वर्षातील 20 वा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने मायदेशात सलग सातवी टी20I मालिका जिंकली. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आनंद व्यक्त केला. तसेच सूर्याने नितीश रेड्डी आणि रिंकू सिंहचं तोंडभरुन कौतुक केलं. नितीशने युवा खेळाडूंबाबतही प्रतिक्रिया दिली. सूर्याने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.

सूर्याने काय म्हटलं?

“मी त्या दोघांसाठी (रिंकू आणि नितीश) आनंदी आहे. त्यांनी मला अपेक्षित तशीच बॅटिंग केली. वेगवेगळे गोलंदाज वेगवेगळ्या परिस्थितीत काय करू शकतात हे मला पाहायचे होते. कधी हार्दिक पंड्या बॉलिंग करत नाही. तर कधी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत नाही. मला इतर खेळाडूंकडे काय गुण आहेत ते पाहायचं होतं. आजचा दिवस हा त्याचा (नितीशचा) होता. त्याचा आनंद द्विगुणित करावा असं मला वाटलं”, असं सूर्याने सामन्यानंतर म्हटलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्लाह, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन