AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : विजयाच्या बाता मारणारा वॉशिंग्टन सुंदर शून्यावर बाद, गरजेवेळी निघाला फुसका बार

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या पारड्यात झुकला आहे. भारतासमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र त्यापूर्वी भारताने नांगी टाकली आहे. इतकंच काय तर वॉशिंग्टन सुंदरही फुसका बार निघाला आहे.

IND vs ENG : विजयाच्या बाता मारणारा वॉशिंग्टन सुंदर शून्यावर बाद, गरजेवेळी निघाला फुसका बार
IND vs ENG : विजयाच्या बाता मारणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर शून्यावर बाद, गरजेवेळी निघाला फुसका बारImage Credit source: Bradley Kanaris/Getty Image
| Updated on: Jul 14, 2025 | 4:35 PM
Share

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. कारण दुसऱ्या डावात भारतासमोर फक्त 193 धावांचं आव्हान होतं. पण भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाची संधी गमावल्यासारखं वाटत आहे. कारण हातात 6 विकेट असताना पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात तीन विकेट गमावल्या. त्यामुळे या सामन्यावर इंग्लंडने पूर्ण पकड मिळवली आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 4 विकेट गमवून 58 धावा केल्या होत्या. मात्र पाचव्या दिवशी 86 धावांवर 7 विकेट तंबूत गेल्या. यात पाचव्या दिवसापूर्वी मोठ्या बाता मारणारा वॉशिंग्टन सुंदरही फेल गेला. त्याने पूर्ण आत्मविश्वासाने पत्रकारांना सांगितलं होतं की सामना जिंकू. पण स्वत: मात्र एकही धाव न करता तंबूत परतला.

वॉशिंग्टन सुंदरने चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर स्काय स्पोर्ट्ला सांगितलं की, ‘उद्या भारत नक्कीच जिंकेल. कदाचित लंचनंतर’ पण इतकं बोल्ड विधान करणारा वॉशिंग्टन सुंदरच नांगी टाकून तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. ऋषभ पंत आणि केएल राहुलची विकेट पडल्यानंतर खरं तर त्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याने अपेक्षाभंग केला. त्यामुळे भारताचा पराभव होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. वॉशिंग्टन सुंदरने 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्यानेच झेल पकडला.

वॉशिंग्टन सुंदर म्हणाला होता की, ‘लॉर्ड्सवर विजय मिळवणे आमच्यासाठी संघ म्हणून खूप खास असेल. ते आश्चर्यकारक असेल. मला खात्री आहे की तुमच्यासाठीही. पाचव्या दिवसाचा खेळ रोमांचक होणार आहे. म्हणजे, विशेषतः चौथ्या दिवसाची शेवटची 15-20 मिनिटे खूप मनोरंजक होती. मी म्हणेन की दोन्ही ड्रेसिंग रूममध्ये आक्रमकता नेहमीच आमच्यात राहते. फक्त एक घटना (क्रॉली-गिल वाद) आणि सर्वजण आक्रमक झाले.’ लॉर्ड्सवर भारताने आतापर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर चार सामने जेमतेम ड्रॉ करण्यात यश आलं आहे.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.