AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : रनआऊट झाल्यानंतर सरफराज खानने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानला धावचीत होत तंबूत परतावं लागलं. सरफराजची खेळी पाहता शतक ठोकेल असंच वाटत होतं. पण रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावचीत होत तंबूत परतावं लागलं. यानंतर पत्रकार परिषदेत सरफराज खानने आपलं मत व्यक्त केलं.

IND vs ENG : रनआऊट झाल्यानंतर सरफराज खानने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
IND vs ENG : रनआऊट झाला तेव्हा नेमकी चूक कोणाची? सरफराज खानने स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Feb 15, 2024 | 8:01 PM
Share

मुंबई : तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाची पकड दिसली. कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांनी दिवस गाजवला. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केली. तर सरफराज खाने 62 धावा करू धावचीत झाला. खरं तर पदार्पणाच्या सामन्यात सरफराज खानची बॅट चांगली तळपताना दिसली. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याला कामी आला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांवर हावी झाला होता. असं सर्व असताना रवींद्र जडेजाच्या एका चुकीमुळे सरफराज खानला धावचीत होत तंबूत परतावं लागलं . सरफराज खानचा डाव 62 धावांवर आटोपला. खरं तर सरफराजची फलंदाजी पाहता आरामात शतक होईल असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण दुर्दैवाने बाद होत तंबूत परतावं लागलं. कर्णधार रोहित शर्मा यालाही राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर फेकून राग व्यक्त केला. पण सामन्यानंतर सरफराज खानने या सर्व गोष्टींवर पडदा टाकला. सरफराज खानने पत्रकार परिषदेत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रनआऊटबाबत त्याने आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं.

“थोडा गैरसमज होता. पण हा खेळाचा भाग आहे. कधी धावपळ होते, कधी धावपळ असते, तर कधी नसते. त्यामुळे हे सर्व चालूच राहील. तो म्हणाला की थोडासा गैरसमज झाला होता. आणि मी म्हणालो की ते ठीक आहे. असे घडत असते, असे घडू शकते. त्यात मोठे काहीच नाही.”, असं सरफराज खान रनआऊटवर बोलला. आता दुसऱ्या दिवशी भारताने 400 धावांचा पल्ला गाठला तर गोलंदाजांना आणखी बळ मिळेल. तसेच पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधीही असेल.

सरफराज खानने टीम इंडियाकडून खेळताना कसं वाटलं याबाबतही सांगितलं. “माझे वडील पहिल्यांदा सामना पाहण्यासाठी येणार नव्हते. अभिमानाचा क्षण असल्याने काही लोकांनी त्यांच मन वळवलं. त्यामुळे ते मैदानात सामना पाहण्यासाठी आले. त्यांनी मला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे भावुक झाले. माझी पत्नीही खूप भावूक झाली होती. माझ्या डोक्यावरून वजन कमी झाल्यासारखे वाटते. इतकी वर्षे त्याने माझ्यावर जे काम केले, त्यांची मेहनत फळास आली.”, असं सरफराज खान याने सांगितलं.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?