AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले, कारण की…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. नाणेफेक गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे.

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले, कारण की...
IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले, कारण की...Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 20, 2025 | 4:55 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. शुबमन गिलने पहिल्याच कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि पहिल्यांदा फलंदाजी करावी लागत आहे. असं असलं तरी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात युवा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे या संघाकडून फार अपेक्षा नसल्या तरी चांगल्या खेळी अपेक्षा आहे. असं असताना भारत आणि इंग्लंडचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत आणि इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी पहिल्या दिवशीच्या सामन्यात काळ्या पट्ट्या बांधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लीड्स कसोटी सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांनी राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरले. यावेळी त्यांनी प्रथम अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळले.

बीसीसीआयने एक्स या सोशल मीडियावर खात्यावर लिहिलं की, ‘भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघाने हेडिंग्ले, लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी अहमदाबाद विमान अपघातातील बळींच्या स्मृतीप्रित्यर्थ मौन पाळले. प्रभावित झालेल्यांशी एकता दर्शविण्यासाठी संघांनी काळ्या हाताच्या पट्ट्या बांधल्या. संघ त्या सर्व लोकांच्या कुटुंब आणि मित्रांप्रति तीव्र संवेदना व्यक्त करते ज्यांनी दुखदपणे जीव गमावला आहे.’

12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान अहमदाबादहून लंडनसाठी रवाना झालं होतं. पण काही सेकंदात विमान कोसळलं. या अपघातात भारतासह इंग्लंडचे नागरिकांचाही मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर दोन्ही संघाचे खेळाडू पहिल्यांदा मैदानात उतरले. तेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधलेली दिसली.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.