AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: बीसीसीआयचा पहिल्या कसोटीबाबत मोठा निर्णय, नक्की काय?

India vs New Zealand 1st Test Day 2 : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे.

IND vs NZ: बीसीसीआयचा पहिल्या कसोटीबाबत मोठा निर्णय, नक्की काय?
M Chinnaswamy Stadium BengaluruImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 16, 2024 | 5:34 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन हे 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र पहिल्याच दिवसाच खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. बीसीसीआयने पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ हा रद्द करण्यात येत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं. या सामन्यातील पाचही दिवस पावसाचं सावट असल्याचं हवामानाच्या अंदाजानुसार सांगण्यात येत होतं. त्यानुसार पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला आहे. आता उर्वरित 4 दिवसही असेच वाया जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.अशात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

सलामीच्या सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस आणि 9 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसानेच आधीच जोरदार बॅटिंग केल्याने खेळ सुरु होऊ शकला नाही. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खेळपट्टी कोरडी होण्यास वेळ लागतो. मात्र पावसाची ये-जा सुरुच असल्याने पहिल्या दिवशी एक बॉलचा खेळ सोडा, टॉसही झाला नाही. अशात क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. आता बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने दुसऱ्या दिवशी टॉस किती वाजता होणार? तसेच खेळाला किती वाजता सुरुवात होणार? याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस होणार आहे. तर 30 मिनिटांनंतर 9 वाजून 15 वाजता सामन्याला सुरुवात होणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. आता दुसऱ्या दिवशी वरुणराजा विश्रांती घेऊन सामन्याची सुरुवात होऊन देणार की आजप्रमाणेच खेळ रद्द करावा लागणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या दिवशी टॉस किती वाजता होणार?

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक