AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: Arshdeep singh ने मोक्याच्या क्षणी सोडलेल्या महत्त्वाच्या कॅचवर विराट कोहली म्हणाला…

IND vs PAK: क्रिकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. आशिया कप स्पर्धेत काल भारत-पाकिस्तान मध्ये दुसरा सामना झाला. त्यावेळी हाच फरक दिसून आला.

IND vs PAK: Arshdeep singh ने मोक्याच्या क्षणी सोडलेल्या महत्त्वाच्या कॅचवर विराट कोहली म्हणाला...
Virat-ArshdeepImage Credit source: twitter
| Updated on: Sep 05, 2022 | 9:36 AM
Share

मुंबई: क्रिकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. आशिया कप स्पर्धेत काल भारत-पाकिस्तान मध्ये दुसरा सामना झाला. त्यावेळी हाच फरक दिसून आला. या सामन्यात पाकिस्तानने अवघड झेल सोडले नाहीत. पण भारताकडून मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंहने सोपा झेल सोडला. सामना नाजूक वळणावर असताना अर्शदीपकडून ही चूक झाली. ज्याची किंमत संघाला चुकवावी लागली. भारताच्या पराभवासाठी फक्त त्या एका कॅचला जबाबदार धरता येणार नाही. पण हा, पराभवाचं ते एक कारण आहे, असं नक्कीच म्हणता येईल.

अर्शदीपच्या कॅच सोडण्यावर कोहली म्हणतो…

भारताचा पराभव झाल्यानंतर काल विराट कोहलीने पत्रकार परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी विराटला अर्शदीपकडून सुटलेल्या कॅच बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विराटने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. एकप्रकारे विराटने अर्शदीपचा बचाव केला.

स्वत:चा अनुभव सांगितला

“अर्शदीपकडून जी चूक झाली, तशीच चूक माझ्याकडूनही झाली होती. करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही चूक मी केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना होता. त्यावेळी शाहीद आफ्रिदीच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून आऊट झालो. त्यानंतर संपूर्ण रात्री मी झोपू शकलो नाही. माझी झोप उडाली होती. माझं करीयर आता संपलं, असाच माझा समज झाला होता” असं विराटने सांगितलं.

“या अशा प्रसंगातून तुम्ही शिकता. हा असाच प्रसंग पुन्हा येऊं दे अशी तुमची इच्छा असते, कारण तुम्ही चूक सुधारलीय हे तुम्हाला दाखवून द्यायचं असतं. अर्शदीपला पुन्हा संधी मिळाल्यानंतर तो, संधी वाया जाऊ देणार नाही, अशी अपेक्षा आहे” असं विराट म्हणाला.

हरभजनकडून बचाव

अर्शदीप सिंहने कॅच ड्रॉप केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जातय. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी या ट्रोलिंगची निंदा करताना अर्शदीपचा बचाव केला. अर्शदीपने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात 3.5 षटकांमध्ये 27 धावा देऊन एक विकेट घेतला.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक