AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: हजारो प्रेक्षकांनी एकत्र गायलं, ‘मां तुझे सलाम’, पहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

टीम इंडिया (Team India) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. आधी दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

IND vs SA: हजारो प्रेक्षकांनी एकत्र गायलं, 'मां तुझे सलाम', पहा अंगावर शहारे आणणारा VIDEO
IND vs SA Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 13, 2022 | 12:22 PM
Share

मुंबई: टीम इंडिया (Team India) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. आधी दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ओदिशा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात अपयशी ठरली. भारताचा पराभव झाला असला, तरी दुसऱ्या टी 20 सामन्यातील छाती अभिमानाने फुलून येईल, असा एक सुंदर व्हिडिओ समोर आलाय. भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामना (IND vs SA) सुरु असताना, हजारो प्रेक्षक ‘मा तुझे सलाम’ हे गाणं गुणगुणत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

सामना सुरु होण्याआधीच हे दृश्य आहे

सामना सुरु होण्याआधीच हे दृश्य आहे, जेव्हा सगळं मैदान भरलं होतं. हजारो प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते, व त्यांनी आपली मोबाइलची फ्लॅश लाइट ऑन केली होती. असंच दृश्य 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळालं होतं.

दक्षिण आफ्रिकेची मालिकेत आघाडी

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 4 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 148 धावा केल्या होत्या. धावा कमी होत्या, तरी फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. पहिल्या 10 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 57 होती. भुवनेश्वर कुमारने पावरप्लेमध्ये तीन विकेट काढून चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र तरीही टीम इंडियाचा पराभव झाला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.