AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीत या तीन चुका केल्या तर पराभव निश्चित! काय ते समजून घ्या

भारतीय संघाची देशात होणाऱ्या कसोटी सामन्यात वाताहत झाल्याचं दिसून आलं आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांच्या देशात चांगली कामगिरी करणारा संघ, भारतात मात्र पराभूत होतं. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने पराभवाची धूळ चारली आहे. आता दुसऱ्या कसोटीतही तशीच भीती सतावत आहे.

IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीत या तीन चुका केल्या तर पराभव निश्चित! काय ते समजून घ्या
IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीत या तीन चुका केल्या तर पराभव निश्चित! काय ते समजून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 19, 2025 | 5:52 PM
Share

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका आता रंगतदार वळणावर आली आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला संभ्रमात टाकलं आहे. आता भारतीय संघावर मालिका गमवण्याची वेळ आली आहे. दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला पहिल्या सामन्यात विजयासाठी फक्त 123 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना भारताने 93 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने भारताला 30 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला आपल्याच भूमीत पराभूत केलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अवघ्या तीन दिवसात संपलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चुकांचा पाढा वाचला. त्यात कर्णधार शुबमन गिलला मानेची दुखापत झाल्याने 10 फलंदाजांसह खेळावं लागलं. त्यामुळे आधीच पाय खोलात गेला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही पराभवाची भीती आहे. कारण भारतीय खेळाडूंचा खेळ पाहता काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. सर्वात मोठं म्हणजे बेजबाबदारपणे खेळण्याची वृत्ती भारतीय क्रिकेटपटूंमध्ये बळावली आहे. त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे.

ही तीन कारणं भारतीय संघाला महागात पडतील

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना आणखी जबाबदारीने खेळावं लागेल. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात आघाडीचे फलंदाज फेल गेले. असं वाटत होतं की गल्ली क्रिकेट खेळत आहेत. दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकल्याचं दिसलं. वाईट खेळूनही पश्चाताप काही दिसला नाही. असंच राहीलं तर दुसरा कसोटी सामना हातातून गमवण्याची वेळ येईल. जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, अन्यथा दुसरा कसोटी सामना गमवण्याची वेळ येईल. ऋषभ पंत आक्रमक खेळी करतो पण त्यातही बॅट चालली तर चालली. एखाद दुसरं शतक लागलं की संघात जागा फिक्स होते. नाही तर संघ अडचणीत येतो. त्यामुळे त्यालाही जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल.

भारतीय फलंदाज फिरकीला चांगलं खेळतात अशी ख्याती आहे. पण मागचे काही सामने पाहता याला नजर लागली असंच म्हणावं लागेल. फिरकीच्या तालावर भारतीय फलंदाज नाचत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामनयात फिरकीपटूंविरुद्ध मजबूत फलंदाजी करावी लागणार आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना कमी लेखण्याची चूक महागात पडली आहे. खरं तर दुसऱ्या डावात 100 च्या आत गुंडाळण्याची संधी होती. पण शेपटच्या फलंदाजांनी भारतीय माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. शेपटच्या फलंदाजांनी ज्या काही धावा केल्या. त्यामुळे भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली. दुसऱ्या कसोटीत हीच चूक महागात पडणार आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.