AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: T 20 मॅच संदर्भात महत्त्वाची बातमी, अचानक सामन्याआधी BCCI कडून नियमात बदल

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पहिला T 20 सामना सुरु व्हायला, आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे.

IND vs SA: T 20 मॅच संदर्भात महत्त्वाची बातमी, अचानक सामन्याआधी BCCI कडून नियमात बदल
IND vs SA Image Credit source: twitter
| Updated on: Jun 09, 2022 | 12:25 PM
Share

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पहिला T 20 सामना सुरु व्हायला, आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. दिल्ली मध्ये होणाऱ्या सामन्याआधी नियमांमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. अंगाची लाही लाही करणारी गर्मी आणि दिल्लीतील तापमान लक्षात घेऊन BCCI ने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. दिल्लीत जास्त तापमान आहे. जून महिन्यात राजधानी दिल्लीत तापमान जास्त असते. वाढत्या गर्मीचा मॅचवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, बीसीसीआयने नियमांमध्ये थोडे बदल केले आहेत. दिल्लीमध्ये तापमान (Dehli Tempreture) सध्या 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. इतक्या गर्मीत मैदानावर उतरुन परफॉर्म करणं, खेळाडूंसाठी सोपं नसतं. दिल्लीच्या गर्मीमुळे काही अघटित घडू नये, यासाठी बीसीसीआयने नियमांमध्ये बदल केला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये मुल्तान येथे सुरु असलेल्या वनडे सीरीजसाठी काही नियम बदलण्यात आले आहेत. हा बदल सुद्धा तसाच आहे. तिथे सामन्याची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयने केलेला बदल हा खेळाडूंच्या ड्रींक्स ब्रेकशी संदर्भात आहे.

का बदलला नियम?

अंगाची लाही लाही करणाऱ्या गर्मीपासून खेळाडूंना थोडा दिलासा देण्यासाठी बीसीसीआयने पहिल्या टी 20 सामन्यात 10 ओव्हर्सनंतर ड्रींक्स ब्रेकचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय स्वागत योग्य आहे. नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान टी 20 च्या एका इनिंगमध्ये कुठलाही ब्रेक घेतला जात नाही. पण दिल्लीची गर्मी लक्षात घेऊन बीसीसीआयने नियम बदलला आहे.

सध्या तरी फक्त दिल्ली पुरताच्या सामन्यासाठी नियम

BCCI ने गर्मी लक्षात घेऊन आता जी भूमिका घेतली आहे, तशीच भूमिका 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या एका सामन्यादरम्यान ICC ने घेतली होती. पहिल्या 10 ओव्हर्सनंतर ड्रींक्स ब्रेक घेण्यात आला होता. सध्यातरी फक्त दिल्ली पुरताच्या सामन्यापर्यंत हा नियम मर्यादीत आहे. उर्वरित चार सामन्यांमध्ये हा नियम लागू होणार की नाही? या बद्दल स्पष्टत नाहीय.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल