AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : आधी जडेजा-पंतची फटकेबाजी, मग गोलंदाजांचा हल्लाबोल, मोहाली कसोटीवर भारताची पकड

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली (Mohali Test) येथे खेळवला जात आहे. या सामन्यावर भारतीय संघाने (Team India) चांगली पकड मिळवली आहे. भारतीय सघाने पहिले दोन्ही दिवस आपल्या नावे केले आहेत.

IND vs SL : आधी जडेजा-पंतची फटकेबाजी, मग गोलंदाजांचा हल्लाबोल, मोहाली कसोटीवर भारताची पकड
IND vs SL Mohali TsetImage Credit source: PTI
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 05, 2022 | 6:36 PM
Share

मोहाली : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली (Mohali Test) येथे खेळवला जात आहे. या सामन्यावर भारतीय संघाने (Team India) चांगली पकड मिळवली आहे. भारतीय सघाने पहिले दोन्ही दिवस आपल्या नावे केले आहेत. रवींद्र जडेजाच्या नाबाद 175 धावा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. त्यानंतर गोलंदाजीमध्येही झटपट विकेट मिळवत दुसरा दिवस संपताना भारताकडे 466 धावांची आघाडी आहे. तर श्रीलंकेची परिस्थिती बिकट आहे. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची अवस्था 4 बाद 108 अशी केली आहे. गोलंदाजीमध्ये आश्विनने 2 आणि जाडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.

टीम इंडियाने कालच्या 6 बाद 357 धावांवरुन आज भारताने 8 बाद 574 पर्यंत मजल मारली. आज जडेजा आणि अश्विन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने सुरुवातीपासून धावफलक हलता ठेवल्यामुळे भारतीय संघाने 550 धावांचा टप्पा ओलांडला. आज सुरुवातीपासून मैदानावर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळतेय. जडेजा आणि अश्विन या जोडीने शतकी भागिदारी केली. तर जडेजाने दमदार खेळीच्या जोरावर 161 चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. अजूनही जडेजा मैदानवर पाय रोवून असून सध्या जेवणाचा ब्रेक झाला आहे. तर दुसरीकडे आर अश्विननेही उत्कृष्ट खेळी करत 61 धाव्या केल्या. त्यानंतर आलेल्या जयंत यादवला (02) मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर मोहम्मद शमी मैदानात आला. त्याने जडेजाला सुरेख साथ देत नाबाद 103 धावांची भागीदारी केली. शमी 20 तर जडेजा 175 धावांवर नाबाद परतले. तत्पूर्वी पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता. श्रीलंकेकडून सुरंगा लकमलने 90 धावात 2, विश्वा फर्नांडोने 135 धावात 2, लसिथ एम्बुलदेनियाने 188 धावात 2 बळी घेतले. तर धनंजय डी सिल्वा आणि लाहिरु कुमाराने प्रत्येकी एक गडी बाद केला.

श्रीलंकेची बिकट अवस्था

भारताने 574 धावांवर डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर पहिल्या डावातील फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आले. पण सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. आश्विनने 2 आणि जाडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेत दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था 108 वर 4 बाद अशी केली असून सध्या पाथुम निसांका (26) आणि चरित असलांका (1) क्रिजवर आहेत.

जडेजाने कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला

रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक होते. यानंतर, त्याने दुसऱ्या सत्रातही आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवली आणि डाव घोषित होण्यापूर्वी 175 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी तर ठरलीच पण 36 वर्ष जुना विक्रमही त्याने मोडीत काढला. जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या आधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 7 व्या क्रमांकावर खेळताना 163 धावा केल्या होत्या.

इतर बातम्या

IND vs SL: रोहितने विराटला मैदानात दिला असा खास सन्मान, जे बोलला ते करुन दाखवलं, पहा VIDEO

IND vs SL 1st Test: रवींद्र जाडेजला डबल सेंच्युरीपासून का रोखलं? राहुल द्रविड जबरदस्त ट्रोल, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल

IND vs PAK, Women’s World Cup 2022: भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला, विजयासाठी होणार भीषण संग्राम

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ