AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL Pink Ball Test : रोहितचा 400 वा सामना, विराटच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा, डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

भारतात खेळवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमधील पहिल्या डावाचे आकडे पाहिले तर ते दोन्ही संघांना घाबरवू शकतात. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात अनुक्रमे 106 आणि 112 धावा झाल्या आहेत.

IND vs SL Pink Ball Test : रोहितचा 400 वा सामना, विराटच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा, डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज
Rohit Sharma, Virat Kohli (Test)
| Updated on: Mar 12, 2022 | 11:31 AM
Share

बंगळुरु : मोहालीतला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आता बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेशी भिडणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली असून आता मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा डे-नाईट कसोटी सामना असेल आणि या स्टेडियमवर हा पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यात 100 टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. विराट कोलहीने (Virat kohli) त्याचं अखेरचं (कारकीर्दीतील 70 वं) शतक डे-नाईट कसोटीतच झळकावलं होतं. तसेच बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी मैदान म्हणजे विराटसाठी दुसरं होम ग्राऊंडच आहे, त्यामुळे आजचा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा 400 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी तसेच मालिकेत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरेल.

नोव्हेंबर 2019 मध्ये याच मैदानात खेळवलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराटनं 136 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर 28 डावांमध्ये विराट कसोटी शतक झळकावू शकलेला नाही. यापैकी 6 डावांमध्ये कोहलीनं 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली 79 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. विराटनं मोहालीमध्ये सामन्यात 45 धावा काढल्या होत्या. आता श्रीलंकेसमोर विराटला त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगलं वातावरण आहे. दरम्यान, मोहालीतील पहिल्या कसोटीत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताने पाचवे स्थान निश्चित केले आहे, त्यानंतर आता टीम इंडिया बंगळुरूमधील विजयासह गुणतालिकेत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.

भारतातल्या डे-नाईट कसोटीच्या पहिल्या डावात सव्वाशे धावा मुश्किल

भारतात खेळवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमधील पहिल्या डावाचे आकडे पाहिले तर ते दोन्ही संघांना घाबरवू शकतात. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात अनुक्रमे 106 आणि 112 धावा झाल्या आहेत. बांगलादेशने भारतात पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात यजमानांनी एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशला पहिल्या डावात 106 धावा करता आल्या आणि भारताने पहिला डाव 9 विकेट गमावून 347 धावांवर घोषित केला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. भारतातील दुसरा डे-नाईट कसोटी सामना अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आला होता. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 112 धावांत आटोपला. भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला.

बंगळुरु… विराटचं दुसरं होम ग्राऊंड

गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीने या मैदानावर अनेक आयपीएल सामने खेळले आहेत, मात्र टीम इंडियासाठी तो केवळ 3 कसोटी सामने खेळला आहे. आणि त्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. कोहलीने या मैदानावर केवळ 4 डाव खेळले असून त्याची 60 पेक्षा जास्त सरासरीने 181 धावा केल्या आहेत. या मैदानावर कोहलीने कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. चिन्नास्वामी येथे त्याने पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावलं होतं. टीम इंडियात नव्याने ओळख झालेल्या कोहलीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली होती. कोहलीच्या कारकिर्दीतील हे केवळ दुसरे आणि भारतातील पहिले शतक ठरले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 51 धावा केल्या.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.