AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ची माहिती

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर त्याने उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याची तक्रार केली होती.

IND vs SL: दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ची माहिती
Ruturaj Gaikwad
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 26, 2022 | 1:57 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) मैदानात सातत्याने चांगली कामगिरी करत असून विजय मिळवत आहे. पण मैदानाबाहेर संघाला खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. संघातील अनेक खेळाडू दुखापतींशी सतत झुंज देत असून या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. एका वृत्तानुसार, 26 आणि 27 तारखेला धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यांमध्येही ऋतुराज खेळू शकणार नाही. ऋतुराजच्या जागी बॅकअप म्हणून मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) संघात समावेश करण्यात आला आहे.

ऋतुराज गायकवाड लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळणार होता, परंतु सामन्यापूर्वी त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. कर्णधार रोहित शर्माने याबाबत माहिती दिली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे ऋतुराजला फलंदाजीत अडचणी येत असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही अपडेट जारी केले होते. वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत असल्याचे बोर्डाने सांगितले होते.

ऋतुराजची NCA मध्ये रवानगी?

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर त्याने उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याची तक्रार केली होती. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. नंतर एमआरआय स्कॅन करण्यात आले आणि तज्ञांचा सल्ला घेण्यात आला. ऋतुराज आता त्यावर उपचार घेऊन बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) या दुखापतीवर काम करणार आहे. निवड समितीने मयंक अग्रवालचा उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी संघात समावेश केला आहे.

मयंक चंदीगडहून धर्मशाला येथे दाखल

दुखापतीमुळे या युवा फलंदाजाला (ऋतुराज) संपूर्ण मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋतुराजच्या जागी सलामीवीर मयंक अग्रवालला तातडीने धर्मशाला येथे पाठवण्यात आले आहे. बॅकअप ओपनर म्हणून मयंक टीम इंडियाशी जोडला गेला आहे. मयंक अग्रवाल सध्या चंदीगडमध्ये भारतीय खेळाडूंसोबत कसोटी मालिकेची तयारी करत होता. अशा परिस्थितीत मयंकला एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये ट्रान्सफर करणे संघ व्यवस्थापनासाठी सोपे होते. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मयंकचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला होता.

ऋतुराजचं दुर्दैव

ऋतुराज गायकवाडच्या टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या मार्गात सातत्याने अडथळे येत आहेत. याआधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे तो तिन्ही सामने खेळू शकला नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजसोबतच्या टी-20 मालिकेत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळणार होती. परंतु दुखापतीमुळे त्याला त्याला संघाबाहेर बसावं लागणार आहे.

इतर बातम्या

IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी

IPL 2022 Schedule: मुंबई इंडियन्ससह अन्य संघांचे कोणाविरुद्ध किती सामने होणार, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Follow Us
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...