AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI T20 मालिका अर्ध्यावर सोडून विराट कोहली घरी परतला, कारण काय? श्रीलंकेवरुद्धही खेळणार नाही

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघापासून (Indian Cricket Team) वेगळा झाला आहे. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेतील (India vs West Indies T20 Series) शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

IND vs WI T20 मालिका अर्ध्यावर सोडून विराट कोहली घरी परतला, कारण काय? श्रीलंकेवरुद्धही खेळणार नाही
Virat Kohli
| Updated on: Feb 19, 2022 | 11:33 AM
Share

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघापासून (Indian Cricket Team) वेगळा झाला आहे. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेतील (India vs West Indies T20 Series) शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तो त्याच्या घरी गेला आहे. बायो बबलमुळे बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. कोहलीला 10 दिवसांची विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यापूर्वी असे वृत्त होते की, टीम इंडियाचा माजी कर्णधार 24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा भाग असणार नाही. ही मालिका लखनौमध्ये सुरू होणार आहे. यानंतर उर्वरित दोन सामने 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथे होणार आहेत.

पीटीआयने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, होय, कोहली शनिवारी सकाळी त्याच्या घरी गेला. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे. बीसीसीआयने निर्णय घेतला होता की सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या सर्व नियमित खेळाडूंना वेळोवेळी बायो बबलमधून ब्रेक दिला जाईल आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा बाकी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. 19 फेब्रुवारीला रात्री संघाची घोषणा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेअंतर्गत दोन सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने मोहाली आणि बंगळुरू येथे होणार आहेत. विराट कोहली कसोटी मालिकेत खेळणार आहे.

आगामी काळात भारताला सातत्याने क्रिकेट खेळायचे आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अफगाणिस्तानविरुद्धदेखील मालिका सुरू झाल्याची बातमी आहे. त्यानंतर आयपीएल आहे. आयपीएलनंतर भारताला कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जावे लागले तर दक्षिण आफ्रिकेचा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. वर्षाच्या अखेरीस T20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मालिका खेळवली जाईल.

इतर बातम्या

23 वर्षीय फलंदाजाची कमाल, रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड मोडित

IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला….

Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.