AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM T20 : कर्णधार गिलची ‘शुभ’ सुरुवात, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच टी20 मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला गेली आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्व शुबमन गिलच्या हाती दिलं आहे. संपूर्ण नवखा संघ असून क्रीडारसिकांना खूप अपेक्षा आहेत.

IND vs ZIM T20 : कर्णधार गिलची 'शुभ' सुरुवात, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
| Updated on: Jul 06, 2024 | 4:16 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. या मालिकेचं नेतृत्व शुबमन गिलकडे असून संपूर्ण संघ नवखा आहे. या संघाकडून भविष्याच्या दृष्टीकोनातून बऱ्याच अपेक्षा आहेत. झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकून विक्रम करण्याची संधी देखील आहे. भारताने आतापर्यंत सलग 12 सामने जिंकले आहेत. अजून 1 सामना जिंकला तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल. कसोटी खेळणाऱ्या संघात भारताला मानाचं स्थान मिळणार आहे. तर दुसरा टी20 सामना जिंकला तर सर्वच पातळींवर भारतीय संघाचा गौरव होईल. दरम्यान शुबमन गिलच्या नेतृत्वात जवळपास संपूर्ण संघच नवा असणार आहे. त्यामुळे झिम्बाब्वे हा संघ दुबळा असला तरी भारताची कसोटी लागणार आहे. पाच सामन्यांसाठी झिम्बाब्वेदेखील सज्ज झाली आहे. झिम्बाब्वेला कमी लेखनं महागात पडू शकतं. झिम्बाब्वेने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्य रहाणे कर्णधार असताना पराभूत केलं आहे. या दोन्ही संघात एकूण 8 सामने झाले. त्यापैकी 6 सामन्यात भारताने तर 2 सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला आहे.  दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकून शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शुबमन गिलने सांगितलं की, “आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मला वाटते की ते एक चांगली खेळपट्टी दिसत आहे. नंतर फारसा बदल होणार नाही.आम्ही 11 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली. तुमच्याकडून नेहमी काही अपेक्षा असतात. आमच्याकडे तीन नवोदित खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग पदार्पण करत आहेत.”

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने सांगितलं की, “प्रथम फलंदाजी करायला माझी हरकत नाही. विकेट चांगली दिसते. या संक्रमणाच्या टप्प्यात झिम्बाब्वे क्रिकेटने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी तरुण खेळाडूंसह लढण्यासाठी सज्ज आहे. या संघाचं नेतृत्व करणे अभिमानस्पद आहे आहे. सीन निवृत्त झाला आहे. त्यामुळे हा संपूर्ण तरुण संघ आहे. भविष्यात एर्विनची भूमिका असेल.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.