AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup Final 2023 | टीम इंडिया आशियाई चॅम्पियन, बांग्लादेशवर मोठा विजय, श्रेयंका पाटिलने काढल्या 9 विकेट

Asia cup Final 2023 | एसीसी वुमेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत श्रेयंका पाटिलने कमालीची बॉलिंग केली. तिला फक्त दोन सामन्यात संधी मिळाली. या दोन्ही मॅचमध्ये श्रेयंका पाटिलने प्रतिस्पर्धी टीमची वाट लावली.

Asia cup Final 2023 | टीम इंडिया आशियाई चॅम्पियन, बांग्लादेशवर मोठा विजय, श्रेयंका पाटिलने काढल्या 9 विकेट
india a won acc womens emerging teams cup beat bangladesh a by 31 runs in finalImage Credit source: acc twitter
| Updated on: Jun 21, 2023 | 1:48 PM
Share

नवी दिल्ली : एसीसी वुमेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारताच्या मुलींनी कमाल केली. हॉन्ग कॉन्गमध्ये ही टुर्नामेंट झाली. इंडिया-ए ने फायनलमध्ये बांग्लादेश-ए टीमवर मात केली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 विकेटवर 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशची टीम 96 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या स्पिनर्सनी विजयाची स्क्रिप्ट लिहिली. श्रेयंका पाटिल आणि मन्नत कश्यपच्या फिरकीसमोर बांग्लादेशची टीम ढेपाळली.

श्रेयंका पाटिलने फायनलमध्ये 13 धावा देऊन बांग्लादेश-ए टीमच्या 4 विकेट काढल्या. तिने 13 पैकी 5 धावा वाइड चेंडूवर दिल्या. म्हणजे बांग्लादेश टीमने या ऑफ स्पिन्समोर बॅटने फक्त 8 धावा केल्या. फायनलमध्ये श्रेयंकाशिवाय डावखुरी फिरकी गोलंदाज मन्नत कश्यपने जबरदस्त गोलंदाजी केली. तिने 20 धावा देऊन 3 विकेट काढल्या. तितास साधुने एक विकेट काढला.

फायनलमध्ये काय झालं?

फायनलमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कॅप्टन श्वेता सेहरावत 20 चेंडूत 13 धावा करुन नाहिदा अख्तरच्या चेंडूवर बोल्ड झाली. त्यानंतर छेत्री आणि दिनेश वृंदा चांगल्या इनिंग खेळल्या. छेत्रीने 22 चेंडूत 36 धावा केल्या. मिडल ऑर्डरमध्ये कनिका आहुजाने 23 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या 127 धावा झाल्या.

श्रेयंका पाटिलची जबरदस्त बॉलिंग

श्रेयंका पाटिल या टुर्नामेंटमध्ये बेस्ट खेळाडू ठरली. 20 वर्षाच्या या ऑफ स्पिनरने 2 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्यात. श्रेयंकाने या दोन मॅचमध्ये फक्त 15 धावा दिल्या. हॉन्ग कॉन्ग विरुद्ध श्रेयंकाने 2 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. फायनलमध्ये तिने 13 धावा देऊन 5 विकेट काढल्या.

टीम इंडिया फक्त दोन मॅच खेळली

या टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया फक्त एक लीग मॅच आणि त्यानंतर थेट फायनलमध्ये खेळली आहे. दोन लीग मॅच आणि सेमीफायनल पावसामुळे होऊ शकली नाही. टीम इंडियाने आपल्या दोन्ही सामन्यात सरस खेळ दाखवला. त्यामुळेच ते एमर्जिंग आशिया कपमध्ये चॅम्पियन बनले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.