AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027 Point Table : कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवल्याने टीम इंडियाला मोठा फायदा, झालं असं की…

भारताने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. यासह भारताला पहिल्या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. तर इंग्लंडला फटका बसला आहे.

WTC 2027 Point Table : कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवल्याने टीम इंडियाला मोठा फायदा, झालं असं की...
WTC 2027 Point Table : कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवल्याने टीम इंडियाला मोठा फायदा, झालं असं की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 04, 2025 | 6:11 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाच सामन्याची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली आहे. ही मालिका बरोबरीत सोडवल्याने भारताचं कौतुक होत आहे. लॉर्ड्स कसोटी मालिका 22 धावांनी गमवली नाही तर ही मालिका भारताने 3-1 ने जिंकली असती. यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी झपाट्याने वाढली आहे. दुसरीकडे, इंग्लंडला या पराभवामुळे फटका बसला आहे. चौथ्या कसोटीत स्लो ओव्हर रेटसाठी 2 गुण कापले होते. त्यात शेवटच्या सामन्यात पराभव यामुळे चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तिन्ही सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे 36 गुण असून विजयी टक्केवारी 100 आहे. तर श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यामुळे 16 गुण आणि विजयी टक्केवारी 66.67 टक्के आहे. भारतीय संघ तिसऱ्या स्थानी असून 28 गुण आणि विजयी टक्केवारी ही 46.67 टक्के झाली आहे. तर इंग्लंडने पाचवा कसोटी सामना गमावल्याने 26 गुणांसह विजयी टक्केवारी ही 43.33 टक्के आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा संघ पाचव्या स्थानी असून 4 गुण आणि विजयी टक्केवारी 16.67 टक्के आहे. त्यात वेस्ट इंडिजने तीन पैकी तीन सामने गमवल्याने शून्य गुणांसह शेवटच्या स्थानी आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान यांनीही एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका

इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 5 गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडला 336 धावांनी पराभवाची धूळ चारली. तिसरा सामना अतितटीचा झाला. हा सामना भारताने अवघ्या 22 धावांनी गमावला. चौथ्या सामन्यात भारताने जबरदस्त झुंज दिली. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. पण भारतीय खेळाडूंनी दोन दिवस फलंदाजी करून सामना ड्रा केला. पाचव्या कसोटी सामनाही अतितटीचा झाला. भारताने या सामन्यात सामन्यात निसटता विजय मिळवला. अवघ्या 6 धावांनी इंग्लंडला पराभूत केलं आणि विजयाची चव चाखली.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत