AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटची विकेट घेण्यापूर्वी सिराजच्या डोक्यात काय सुरु होतं? ब्रूकचा झेल आणि सगळं काही सांगितलं…

भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली आणि इंग्लंडचं त्यांच्या भूमीत दणका दिला. खरं तर पाचवा कसोटी सामना अतितटीचा झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा आशा अनेकांनी सोडून दिल्या होत्या. पण पाचव्या दिवशी चमत्कार झाला आणि टीम इंडियाने विजय मिळवला.

शेवटची विकेट घेण्यापूर्वी सिराजच्या डोक्यात काय सुरु होतं? ब्रूकचा झेल आणि सगळं काही सांगितलं...
शेवटची विकेट घेण्यापूर्वी सिराजच्या डोक्यात काय सुरु होतं? ब्रूकचा झेल आणि सगळं काही सांगितलं...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 04, 2025 | 4:53 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताने अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. खऱं तर पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती आणि चार विकेट हातात होत्या. त्यामुळे हा सामना इंग्लंड सहज जिंकेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी केली आणि इंग्लंडला रोखलं. मोहम्मद सिराजने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 30.1 षटक टाकत 104 धावा दिल्या आणि पाच विकेट घेतल्या. दरम्यान, ख्रिस वोक्स फलंदाजीला येईल की नाही याबाबत शंका होती. पण हात मोडल्यानंतरही ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी आला. गस एटकिनसनने त्याला शेवटपर्यंत स्ट्राईक दिली नाही आणि एका बाजूने झुंज सुरु ठेवली. त्याने एक षटकार मारला आणि भारताच्या विजयाचा आशा मावळल्या. आता काही खरं नाही असंच वाटत होतं.

कर्णधार शुबमन गिलने त्याच्याकडे 7 धावांची गरज असताना षटक सोपवलं. प्रत्येक भारतीय क्रीडाप्रेमी देवाचं नाव घेत असावा आणि चमत्कार घडावं तसंच झालं. इंग्लंडला विजयासाठी 7 धावांची गरज होती आणि स्ट्राईकला गस एटकिनसन होता. पण पहिल्याच चेंडूवर सिराजने त्याचा त्रिफळा उडवला आणि भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर मोहम्मद सिराजने सांगितलं की, ‘मी फक्त विचार करत होतो की मी योग्य क्षेत्रात गोलंदाजी करावी. खरे सांगायचे तर, मी (ब्रूक) झेल घेईन आणि दोरीवर पाऊल ठेवेन असे मला वाटले नव्हते. तो सामना बदलणारा क्षण होता. हो, मी नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवला की मी संघासाठी हे करेन.’

पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या. त्या बदल्यात इंग्लंडने 247 धावा केल्या आणि 23 धावांची आघाडी घेतली. भारताने ही आघाडी मोडली तसेच एकूण 396 धावा केल्या. पण त्यातून 23 धावा वजा करत 373 धावा आल्या आणि विजयासाठी 374 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान गाठताना इंग्लंडचा संघ 367 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार