AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025: टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार! तारीखही निश्चित, जाणून घ्या

India vs Pakistan: टीम इंडिया आणि पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. जाणून घ्या तारीख.

Champions Trophy 2025: टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार! तारीखही निश्चित, जाणून घ्या
bumrah and virat ind vs pakImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 03, 2024 | 9:27 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन वनडे वर्ल्ड कप फायनलचा वचपा काढला. तर सेमी फायनलमध्ये इंग्लंडलचा धुव्वा उडवत त्यांचा हिशोब क्लिअर केला. टीम इंडियाने कुणालाच सोडलं नाही. टीम इंडियाने सर्वांचा ‘टप्प्यात’ कार्यक्रम केला. टीम इंडियाने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. लो स्कोअरिंग सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अफलातून बॉलिंगच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला. दोन्ही देशांमध्ये ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधामुळे द्विपक्षीय मालिका होत नाहीत. दोन्ही संघ आयसीसी ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेत आमनेसामने असतात. आता टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. पीसीबीने याबाबतची घोषणा केली आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं आहे.मात्र बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाकडून कोणतीही माहिती देण्यात आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हे 2025 मध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

पीटीआयनुसार, पीसीबीने आयसीसीला 15 मॅचचं ड्राफ्ट शेड्युल दिलं आहे. रिपोर्ट्सनुसार, या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 9 मार्चला अंतिम सामना होणार आहे. तसेच अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे सर्व सामने हे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

महामुकाबला केव्हा?

पीसीबीच्या शेड्युलनुसार, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 1 मार्च रोजी होणार आहे. हा सामना लाहोरमध्ये आयोजित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. आयसीसीच्या सदस्याने पीटीआला दिलेल्या माहितीनुसार, “पीसीबीने आयसीसीला 15 सामन्यांचं वेळापत्रक दिलं आहे. त्यानुसार, 7 सामने लाहोर, 3 कराची आणि 5 रावलपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना आणि उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे कराचीत होतील आणि लाहोरमध्ये अंतिम सामना होणार आहे.

दरम्यान आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नाही. तेव्हाही पाकिस्तानकडे यजमानपद होतं. मात्र टीम इंडियाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आले. त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की हायब्रिड पद्धतीनुसार तोडगा निघणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!