AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : धवन-विराट बाद झाल्यावर आमचा डाव गडगडला, कप्तान राहुलकडून पराभवाचं खापर मधल्या फळीवर

कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (IND vs SA One Day Series) भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक प्रदर्शन सुरुच आहे. बुधवारी उभय संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला.

IND vs SA : धवन-विराट बाद झाल्यावर आमचा डाव गडगडला, कप्तान राहुलकडून पराभवाचं खापर मधल्या फळीवर
KL Rahul
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 20, 2022 | 9:47 AM
Share

पार्ल : कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (IND vs SA One Day Series) भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक प्रदर्शन सुरुच आहे. बुधवारी उभय संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवनच्या (Shikhar dhawan) 79 धावा, विराट कोहलीची (Virat kohli) अर्धशतकी खेळी आणि शार्दुल ठाकूर नाबाद (50) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. भारताने 50 षटकात आठ बाद 265 धावा केल्या. शार्दुलने अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. भारताची मधली फळी ढासळल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेतील पराभवासह भारतीय कर्णधार केएल राहुलने पराभवाचं खापर मधल्या फळीवर फोडलं आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये केएल राहुल म्हणाला, “हा सामना खूप काही शिकण्यासारखा होता. यामध्ये आम्ही चांगली सुरुवात केली. पण आम्ही मधल्या षटकात विकेट्स गमावत राहिलो, त्यामुळे सामना आमच्या हातातून निसटला. मधल्या षटकात विकेट्स गमावणे टाळावे लागेल. तरच आम्ही समोरच्या संघाला रोखू शकतो.”

खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती : राहुल

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या विकेटवर (खेळपट्टी) बोलताना केएल राहुल म्हणाला, “मी 20 षटकांच्या पुढे फलंदाजी केली नाही. पण त्यात फारसा बदल झाला आहे असे वाटत नाही. जेव्हा मी धवन आणि विराटशी विकेटबद्दल बोललो तेव्हा त्यांनी ती अधिक चांगली असल्याचे सांगितले. तो म्हणाला की खेळपट्टीवर थोडा वेळ घालवल्यानंतर फलंदाजी करणे सोपे होते. दुर्दैवाने त्यांच्यातील भागीदारी केवळ 92 धावांचीच होऊ शकली.

राहुल म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. त्याने आमच्या गोलंदाजांवर सतत दबाव ठेवला. मधल्या षटकात आम्ही विकेट घेण्यात अयशस्वी झालो, त्यामुळे त्यांना 290 पेक्षा जास्त धावा करता आल्या. याशिवाय आमच्या बाजूने विराट-धवनव्यतिरिक्त मोठी भागीदारी होऊ शकली नाही.”

भारताची मधळी फळी कमकुवत

46 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर पुढे शिखऱ धवन आणि विराट कोहलीने डाव सावरला, दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 92 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला. धावफलकावर 138 धावा असताना शिखर धवन बाद झाला. डावखुरा गोलंदाज केशव महाराजचा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळला आणि धवन क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर विराटही खेळपट्टीवर फार वेळ टिकला नाही. (51) धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर त्याने बावुमाकडे झेल दिला. हे दोघे बाद झाल्यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पदार्पण करणाऱ्या वेंकटेशन अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या. पण तिघेही स्वस्तात बाद झाले. खरंतर या युवा खेळाडूंना काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी होती, ती त्यांनी गमावली. अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरन 43 धावांत 50 धावा फटकावल्या आणि तो नाबाद राहिला, मात्र तोवर सामना हातून निसटला होता.

इतर बातम्या

Shardul Thakur: बॉलिंगमध्ये फ्लॉप पण बॅटिंगमध्ये हिट, लॉर्ड शार्दुलच ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची जागा घेणार?

U19 World Cup: भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, 12 चेंडूत 48 धावा तडकावणारा हरनूर ठरला हिरो

IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव

(India vs South Africa, KL Rahul blames middle-order for losing first ODI)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो