AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: ‘म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?’ रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?

भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies ODI) दरम्यानच्या पहिल्या वनडेआधी त्याने प्लेईग इलेवन वरुन हे वक्तव्य केलं.

IND vs WI: 'म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?' रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 4:49 PM
Share

अहमदाबाद: रोहित शर्मा (Rohit sharma) पत्रकार परिषदेदरम्यान अनेकदा गमतीशीर वक्तव्य करतो. भारताच्या वनडे (Indian Cricket Team)आणि टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर रोहितचा आज हाच अंदाज पहायला मिळाला. भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies ODI) दरम्यानच्या पहिल्या वनडेआधी त्याने प्लेईग इलेवन वरुन जे वक्तव्य केलं, ते ऐकून सर्वांनाच हसू आलं. रोहित शर्माला पत्रकारांनी पहिल्या तीन पोजिशनवर युवा खेळाडूंना संधी मिळण्यासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर त्याने गमतीशीर उत्तर दिलं. “म्हणजे तुम्हाला म्हणायचय की, ऋतुराज गायकवाड, इशान किशनला सलामीवीर बनवलं पाहिजे. मला आणि शिखर धवनला संघाबाहेर केलं पाहिजे का?” असा गमतीने त्याने प्रतिप्रश्न केला. हे बोलताना स्वत: रोहित शर्माला सुद्धा हसू आवरलं नाही. त्याचबरोबर प्रश्न विचारणारे पत्रकारही हसू लागले.

युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळेल युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळेल, हे रोहितने स्पष्ट केलं. इशान किशन त्याच्यासोबत उद्या ओपनिंगला येणार असल्याचं त्याने सांगितलं. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाडला कोरोना झाल्याने, त्यांच या मालिकेत खेळणं मुश्किल दिसतय. इशान किशनला म्हणूनच सलामीची संधी मिळत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध आधी संघाची घोषणा केली, तेव्हा इशान किशन संघाचा भागही नव्हता.

तिघांचं खेळणं निश्चित नाही “धवन, गायकवाड आणि श्रेयस अय्यर तिघेही आयसोलेशनमध्ये आहेत. ते खेळण्यासाठी कधी उपलब्ध होतील, या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. सध्या तिघेही आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण त्यांच्या खेळण्याबद्दल आताच काही निश्चिपणे सांगता येणार नाही” असं रोहित म्हणाला.

कोरोनामुळे संघाचा बॅलन्स बिघडतो कोरोनामुळे स्थिती खराब होते आणि संघाचा बॅलन्स बिघडतो असे रोहितने सांगितले. “कोरोनामुळे कठीण स्थिती आहे. कोरोनामुळे बरच काही अनिश्चित आहे. असं काही घडल्यानंतर बर होण्याचा वेगवेगळा कालावधी असतो. अनेकदा सात-आठ दिवस लागतात. काही वेळा 14 दिवसही लागतात” असे रोहितने सांगितलं.

India vs west indies first odi Me & dhawan should out of the team Rohit sharma said in press conference

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली