AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: ‘म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?’ रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?

भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies ODI) दरम्यानच्या पहिल्या वनडेआधी त्याने प्लेईग इलेवन वरुन हे वक्तव्य केलं.

IND vs WI: 'म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?' रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 4:49 PM
Share

अहमदाबाद: रोहित शर्मा (Rohit sharma) पत्रकार परिषदेदरम्यान अनेकदा गमतीशीर वक्तव्य करतो. भारताच्या वनडे (Indian Cricket Team)आणि टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर रोहितचा आज हाच अंदाज पहायला मिळाला. भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies ODI) दरम्यानच्या पहिल्या वनडेआधी त्याने प्लेईग इलेवन वरुन जे वक्तव्य केलं, ते ऐकून सर्वांनाच हसू आलं. रोहित शर्माला पत्रकारांनी पहिल्या तीन पोजिशनवर युवा खेळाडूंना संधी मिळण्यासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर त्याने गमतीशीर उत्तर दिलं. “म्हणजे तुम्हाला म्हणायचय की, ऋतुराज गायकवाड, इशान किशनला सलामीवीर बनवलं पाहिजे. मला आणि शिखर धवनला संघाबाहेर केलं पाहिजे का?” असा गमतीने त्याने प्रतिप्रश्न केला. हे बोलताना स्वत: रोहित शर्माला सुद्धा हसू आवरलं नाही. त्याचबरोबर प्रश्न विचारणारे पत्रकारही हसू लागले.

युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळेल युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळेल, हे रोहितने स्पष्ट केलं. इशान किशन त्याच्यासोबत उद्या ओपनिंगला येणार असल्याचं त्याने सांगितलं. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाडला कोरोना झाल्याने, त्यांच या मालिकेत खेळणं मुश्किल दिसतय. इशान किशनला म्हणूनच सलामीची संधी मिळत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध आधी संघाची घोषणा केली, तेव्हा इशान किशन संघाचा भागही नव्हता.

तिघांचं खेळणं निश्चित नाही “धवन, गायकवाड आणि श्रेयस अय्यर तिघेही आयसोलेशनमध्ये आहेत. ते खेळण्यासाठी कधी उपलब्ध होतील, या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. सध्या तिघेही आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण त्यांच्या खेळण्याबद्दल आताच काही निश्चिपणे सांगता येणार नाही” असं रोहित म्हणाला.

कोरोनामुळे संघाचा बॅलन्स बिघडतो कोरोनामुळे स्थिती खराब होते आणि संघाचा बॅलन्स बिघडतो असे रोहितने सांगितले. “कोरोनामुळे कठीण स्थिती आहे. कोरोनामुळे बरच काही अनिश्चित आहे. असं काही घडल्यानंतर बर होण्याचा वेगवेगळा कालावधी असतो. अनेकदा सात-आठ दिवस लागतात. काही वेळा 14 दिवसही लागतात” असे रोहितने सांगितलं.

India vs west indies first odi Me & dhawan should out of the team Rohit sharma said in press conference

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.