AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies : अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगवर रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या…

भारत आणि वेस्ट इंडिजमधील तीन एकदिवसीय सामन्यांचा शेवटचा सामना 27 जुलैला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, एका ट्विटविषयी जाणून घ्या...

India vs West Indies : अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगवर रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...
अक्षर पटेल, रोहित शर्माImage Credit source: social
| Updated on: Jul 26, 2022 | 7:03 AM
Share

नवी दिल्ली : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) दोन गडी राखून पराभव केला. ही मॅच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळली गेली. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो होता अष्टपैलू अक्षर पटेल (Akshar Patel). पटेलनं आपल्या 40व्या एकदिवसीय सामन्यात पहिलं अर्धशतक झळकावून टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून दिला. हा डावखुरा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच फलंदाजीत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला. अक्षरनं 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली आणि धोनीच्या शैलीत षटकार खेचून सामना संपवला. त्याची ही खेळी पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगचे सगळेच चाहते झाले आहेत. सोशल मीडियावर तो खूप चर्चेत असतो.

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं अक्षरच्या स्तुतीसाठी गुजराती भाषेत एक मनोरंजक ट्विट केलं आहे. रोहितनं लिहिलं, ‘वाह. काल रात्री टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. बापू बडू सरु चे. गुजरातीमध्ये ‘बापू बधू सरू चे’ म्हणजे – बापू ठीक आहे. भारतीय खेळाडू अक्षर पटेल यांना बापूच्या नावानं हाक मारतात हे लक्षात घेण्यासारखं आहे.

एकवेळ टीम इंडियाच्या 5 विकेट 205 धावांवर पडल्या होत्या. टीम इंडियाला विजयासाठी 68 चेंडूत 107 धावा करायच्या होत्या. यानंतर दीपक हुड्डा यांनी अक्षर पटेलसोबत आघाडी घेतली. हुडानं 36 चेंडूत 33 धावा केल्या. दुसऱ्या टोकाला अक्षर पटेलनं आपला झंझावाती फॉर्म दाखवला. अक्षरने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक केले. हुड्डा बाद झाल्यानंतर त्याने शेपटीच्या फलंदाजांसह छोट्या भागीदारी खेळल्या. सामनावीर अक्षर पटेलने 35 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीनं नाबाद 64 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 182 होता. अक्षर पटेलला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हायलाईट्स

  • अक्षरनं 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली आहे
  • एमएस धोनीच्या शैलीत षटकार खेचून सामना संपवला
  • त्याची ही खेळी पाहून भारताचा कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे
  • अक्षर पटेलच्या मॅचविनिंग इनिंगचे सगळेच चाहते झाले आहेत
  • सोशल मीडियावर तो खूप चर्चेत असतो.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांचा शेवटचा सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि सोशल मीडियावर चर्चे रंगलीय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.