AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचीच मोहोर’, या पाकिस्तानी क्रिकटर्सचे भाकीत व्हायरल

ICC Women Cricket World Cup 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास घडवला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धुळ चारली. तर महिला क्रिकेट विश्वचषक भारतच जिंकणार असा दावा या पाक खेळाडूने केला आहे. त्याचे हे भाकीत व्हायरल झाले आहे.

'महिला क्रिकेट विश्वचषकावर भारताचीच मोहोर', या पाकिस्तानी क्रिकटर्सचे भाकीत व्हायरल
महिला क्रिकेट विश्वचषक
| Updated on: Oct 31, 2025 | 11:24 AM
Share

India Vs South Africa Final Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास घडवला. बलाढ्य ऑस्ट्रेलिया महिला संघाला पराभूत करून सर्वांनाच टीम इंडियाने धक्का दिला. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाशी भारतीय संघाचा सामना होईल. त्यापूर्वी हा सामना कोण जिंकणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women Cricket World Cup 2025) जिंकणार असल्याचा दावा पाक खेळाडूने केला आहे. त्याचे हे भाकीत व्हायरल झाले आहे.

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने भारत जिंकणार असल्याचा दावा केला आहे. भारतीय महिला टीमने या महिला विश्वचषक सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी बजावली आहे. टीम इंडियाला या विश्वचषकाचा कणखर दावेदार मानल्या जात आहे. भारतीय पुरुष संघाने आशिया कप जिंकला. आता भारतीय महिला वनडे वर्ल्ड कप जिंकणार. याशिवाय पुरुषांचा टी20 वर्ल्ड कप सुद्धा भारतच जिंकणार असल्याचा दावा दानिश कनेरिया याने केला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा हा संघ प्रबळ ठरण्याची दाट शक्यता त्याने वर्तवली.

पाकिस्तानच्या क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी

ऑस्ट्रेलिया हा एक बलाढ्य संघ होता. त्यांच्या महिला खेळाडू पुरुषांसोबत खेळतात. त्यांची तंदुरुस्ती अगदी जोरदार होती. ऑस्ट्रेलिया जोरदार सामान खेळला. तरीही भारतीय संघाने हा सामना स्वतःच्या खिशात घातला. दानिशने रोड्रिग्स आणि हरमनप्रीत कौरचे कौतुक केले. 338 धावांचे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे काम नव्हते. पण भारतीय महिला संघाने जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. या महिला खेळाडूंनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.

भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवले

पाकिस्तानच्या क्रिकेटरने पुढे सांगितले की, भारतीय संघाने सुरुवातीला त्याचे दोन गडी लवकर बाद झाल्यावरही मोठी कामगिरी केली. टीमने स्वतःला सांभाळले. ते मानसिक दबावाखाली आले नाही. खालच्या फळीतील खेळाडूंनी मोठी खेळी खेळली. त्यांनी फिटनेसची चुणूक दाखवली. गुरुवारी ऑस्ट्रेलिया संघाने 49.5 षटकात 338 धावांचा डोंगर उभारला. फोएबे लिचफील्डने 119, तर एश्ले गार्डनरने 63 धावा केल्या. भारतीय संघाने हे लक्ष्य 48.3 षटकात पूर्ण केले. जेमिमा रोड्रिग्सने 134 चेंडूत 14 चौकारासह नाबाद 127 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 89 धावा केल्या आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून या चषकावर नाव कोरण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका