WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याअगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने भारतीय संघासाठी कडक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. (Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!
WTC Final
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 8:14 AM

मुंबई : कसोटी क्रिकेटचा ‘वर्ल्ड कप’ मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2021) 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारताची गाठ न्यूझीलंडशी (India and New Zealand) पडत आहे. पण या बहुप्रतिक्षित सामन्याअगोदर तथा भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याअगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने भारतीय संघासाठी कडक नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या कडक नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे. (Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

भारतीय संघाला इंग्लंडमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार

न्यूझीलंडशी अंतिम सामन्यात दोन हात करण्याअगोदर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार आहे. आयसीसीने शनिवारी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. परंतु भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर किती दिवसांचा क्वारन्टाईन पिरिअड असणार आहे, याची माहिती तूर्तास तरी आयसीसीने दिलेली नाहीय. परंतु हे मात्र नक्की की 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या भारतीय संघाला पुढचे काहि दिवस हॉटेलमध्ये क्वारन्टाईन रहावं लागणार आहे.

भारताअगोदर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये पोहोचली

भारतीय संघाअगोर न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याअगोदर इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडला खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ आधीच इंग्लंडला पोहोचलाय. न्यूझीलंड संघातील खेळाडूंचा त्यासाठी कसून सराव सुरु आहे.

आयसीसीच्या प्रेस रिलीजनुसार, भारतीय संघ इंग्लंडच्या विमानतळावर उतरल्यानंतर तिथून थेट हॅम्पशायर बाऊलमधील हॉटेलमध्ये पोहोचेल जिथं क्वारन्टाईनसंबंधी सगळी व्यवस्था केलेली आहे. क्वारन्टाईन करण्याआधी खेळाडूंच्या आरोग्यासंबंधी चौकशी केली जाईल.

न्यूझीलंड संघासाठी, ईसीबीने (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) तीन दिवस कठोर क्वारन्टाईन केलं आहे. आणि त्यानंतर खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली जाईल.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

(Indian team hard Quarantine period before World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

एक पराभव आणि प्रशिक्षकाला डच्चू, नामांकित संघाने महान माजी खेळाडूला घरी पाठवलं!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.