AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून एबी डिव्हिलियर्स यंदा IPL खेळणार नाही, दिनेश कार्तिकने सांगितलं कारण

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. संघाने कर्णधार बदलला, अनेक नवीन खेळाडू संघात आले आहेत. स्पर्धेच्या 15 व्या हंगामात आयपीएल जिंकण्याचे आरसीबीचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आरसीबीच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

...म्हणून एबी डिव्हिलियर्स यंदा IPL खेळणार नाही, दिनेश कार्तिकने सांगितलं कारण
Dinesh Karthik Image Credit source: TWITTER
| Updated on: Mar 23, 2022 | 12:27 PM
Share

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. संघाने कर्णधार बदलला, अनेक नवीन खेळाडू संघात आले आहेत. स्पर्धेच्या 15 व्या हंगामात आयपीएल जिंकण्याचे आरसीबीचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आरसीबीच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. आरसीबीने फॅफ डू प्लेसिसची (Faf du Plessis) कर्णधारपदी नियुक्ती केली असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ उत्तम कामगिरी करण्यास तयार असल्याचे विराट कोहलीने (Virat Kohli) म्हटले आहे. मात्र, आरसीबीला एबी डिव्हिलियर्सची उणीव भासणार आहे. एबी डिव्हिलियर्सने स्पर्धात्मक क्रिकेटला अलविदा केला आहे. दरम्यान, आरसीबीमध्ये दाखल झालेल्या दिनेश कार्तिकने एबीच्या अनुपस्थितीबाबत वक्तव्य केलं आहे.

एबी डिव्हिलियर्सचे आयपीएल न खेळण्याचे कारण दिनेश कार्तिकने दिले. दिनेश कार्तिकने आरसीबीच्या एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, एबी डिव्हिलियर्स आयपीएल खेळत नाही कारण तो खूप चांगला खेळतो. आरसीबीच्या व्हिडीओमध्ये दिनेश कार्तिकने गंमतीने असे म्हटले आहे.

आरसीबीला डिव्हिलियर्सची उणीव भासेल

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या आयपीएल कारकीर्दीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. या फलंदाजाने 184 सामन्यात 39.7 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151.7 होता. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आता ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांना आरसीबीच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

आरसीबीकडे सर्वोत्तम फलंदाजांची फौज

IPL 2022 बद्दल बोलायचे झाले तर RCB चे बॅटिंग युनिट नेहमीप्रमाणे खूप मजबूत दिसत आहे. डू प्लेसिस, मॅक्सवेल, विराट कोहली, दिनेश कार्तिक असे एकापेक्षा एक उत्तम फलंदाज संघात दिसत आहेत. याशिवाय अनुज रावत, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, वानेंदू हसरंगा हे खेळाडूही या संघात सहभागी झाले आहेत. गोलंदाजीत जेसन बेहरेनडॉर्फ, जोश हेझलवूड यांची भर पडल्याने आरसीबीची ताकद वाढली आहे. याशिवाय मोहम्मद सिराज, हर्षल पटेल हे आधीच या संघाचा भाग आहेत. 27 मार्च रोजी RCB पंजाब किंग्ज विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

इतर बातम्या

IPL 2022 मध्ये कॉमेंटेटर्स होणार मालामाल, हर्षा भोगले ते सुनील गावस्कर जाणून घ्या दिग्गजांची ‘फी’

IPL 2022 ला चार दिवस उरलेले असताना Delhi Capitals साठी मोठी गुड न्यूज, हुकूमी एक्का 7 एप्रिलला करणार कमबॅक

Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.