AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI | मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरुच , सलग 11 वर्षांपासूनची परंपरा कायम

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सुरुवात ही पराभवाने झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईवर 8 विकेट्सने विजय मिळवत या हंगामातील सुरुवात विजयाने केली आहे. तर मुंबईवर असलेला तो डाग पुसण्यासाठी आणखी एक वर्षाची प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.

RCB vs MI | मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरुच , सलग 11 वर्षांपासूनची परंपरा कायम
| Updated on: Apr 03, 2023 | 12:15 AM
Share

बंगळुरु | मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील गेल्या 10 वर्षातील परंपरा या वर्षातही कायम ठेवली आहे. मुंबईचा आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं 2013  पासून प्रत्येक मोसमातील आपला पहिला सलामीचा सामना जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. मुंबईची पराभवाने सुरुवात झाल्याने मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला आणि मुंबईच्या चाहत्यांना विजयी सुरुवातीसाठी पुढील मोसमाची वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 2013 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत  प्रत्येक मोसमातील आपला सुरुवातीचा  सामना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विजय मिळवत विजयाने सुरुवात केली होती.  मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबईला विजयी सुरुवात करण्यात अपयश आलेलं आहे. मुंबईला सलग 11 मोसमांमध्ये पराभवाने सुरुवात करावी लागली आहे.  मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम आहे. मुंबईने 2013 पासून एकूण 5 वेळा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकली आहे. मात्र 2013 पासून एकदाही मोसमाची सुरुवात विजयाने करता आलेली नाही.

मुंबईची कामगिरी

प्रत्येक मोसमातील सुरुवात ही विजयाने व्हावी, अशी इच्छा प्रत्येक संघाची असते. मात्र मुंबईला गेल्या 10 वर्षात विजयी सलामी देता आलेली नाही. त्यामुळे मुंबई यंदा आरसीबीवर विजय मिळवत आपल्यावर लागलेला डाग पूसन काढेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पलटणने ही नकोशी परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मुंबईला हा डाग पुसून काढण्यासाठी आणि विजयी सुरुवात करण्यासाठी आणखी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.