AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : लखनौने गुजरातला 33 धावांनी केलं पराभूत, टॉप 2 च्या मार्गात घातला खोडा

आयपीएल 2025 स्पर्धेतील 64व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी धुव्वा उडवला. यामुळे गुजरात टायटन्सचा टॉप 2 मार्ग कठीण झाला आहे. आता टॉप 2 ची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. पंजाब किंग्स आणि आरसीबीच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल.

IPL 2025 : लखनौने गुजरातला 33 धावांनी केलं पराभूत, टॉप 2 च्या मार्गात घातला खोडा
लखनौ सुपर जायंट्सImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2025 | 11:43 PM
Share

गुजरात टायटन्सचं सहज टॉप 2 मध्ये राहण्याचं स्वप्न भंगलं आहे. कारण आता टॉप 2 स्थानाची शर्यत चुरशीची झाली आहे. आता गुजरात टायटन्स गुणतालिकेत टॉपला असली तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला एक संधी अधिक आहे. आयपीएल 2025 स्पर्धेतील 64वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने सहज जिंकला. लखनौचं प्लेऑफचं स्वप्न आधीचं भंगलं आहे. पण गुजरात टायटन्सच्या टॉप 2 मार्गात खोडा घातला आहे. लखनौ सुपर जायंटस्ने 20 षटकात 2 गडी गमवून 235 धावा केल्या आणि विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर विकेट टप्प्याटप्प्याने पडल्या आणि विजयी धावांचं अंतर वाढलं. अखेर लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 202 धावा केल्या.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच फसगत झाली. लखनौ सुपर जायंट्सने गुजरातच्या गोलंदाजांची पिसं काढली. एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिचेल मार्शचा झंझावात सुरु झाला. मिचेल मार्शने 64 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 24 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 56 धावा, तर ऋषभ पंतने 6 चेंडूत 2 चौकार मारत नाबाद 16 धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्सचं टॉप 2 गणित

गुजरात टायटन्स संघ आतापर्यंत 13 सामने खेळला आहे. त्यापैकी 9 सामन्यात विजय आणि 4 सामने गमावले आहेत. सध्या 18 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आता शेवटचा सामना जिंकला तर 20 होतील. गुजरात टायटन्सचं टॉप 2 चं गणित आता पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर अवलंबून असणार आहे. कारण या दोन्ही संघांचे स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. गुणतालिकेत सध्या दोन्ही संघाचे 17 गुण आहेत आणि उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर 21 होतील. तसेच टॉप 2 मध्ये स्थान पक्कं होईल. त्यामुळे या दोन्ही संघापैकी निदान एकाने एक सामना गमवावा अशी प्रार्थना आता गुजरात टायटन्सचे चाहते करत आहेत.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?