AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, RCB vs KKR : पहिल्याच सामन्यात आरसीबीला कोलकात्याच्या तीन खेळाडूंचं टेन्शन, कोण ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने सुरुवात होईल. 22 मार्चला हा सामना असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. पहिल्या सामन्यात कोणता संघ भारी पडणार याची उत्सुकता लागून आहे. दुसरीकडे, कोलकात्याचे तीन खेळाडू आरसीबीसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

IPL 2025, RCB vs KKR : पहिल्याच सामन्यात आरसीबीला कोलकात्याच्या तीन खेळाडूंचं टेन्शन, कोण ते जाणून घ्या
आरसीबी विरुद्ध केकेआर
| Updated on: Mar 19, 2025 | 6:15 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्थितीबाबत चर्चा होताना दिसत आहे. कारण मागच्या पर्वात आरसीबीचा जेतेपदासाठी प्रयत्न सुरु आहे. पण पदरी निराशा पडत आहे. मेगा लिलावानंतर संघ बांधणी केली असून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी आरसीबी संघ सज्ज आहे.पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. दोन्ही संघात तुल्यबल खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल याबाबत सांगणं कठीण आहे. केकेआरमध्ये असे काही खेळाडू आहेत जे यावेळी आरसीबीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मागच्या दोन पर्वात कोलकात्याने पहिल्याच सामन्यात आरसीबीला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे या पर्वात विजय मिळवून विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी उत्सुक आहेत. तर आरसीबी यावेळी स्पर्धेत विजयाने सुरुवात करण्यास इच्छुक आहे.

क्विंटन डी कॉक: दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यावेळी केकेआरचा भाग आहे. मेगा लिलावात कोलकात्याने त्याच्या किंमत मोजली आणि संघात घेतलं. क्विंटन डी कॉकला आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी आरसीबीसाठी खेळला असून सलामी उतरला ठआहे.. डी कॉक हा एक उत्तम खेळाडू आहे. क्विंटन एकदा का क्रीजवर स्थिरावला की, नंतर सामना प्रतिस्पर्ध्याच्या हातून निसटू शकतो. त्यामुळे क्विंटन हा आरसीबीसाठी मोठं संकट ठरू शकतो.

सुनील नरीन : सुनील नरीन गेल्या काही वर्षांपासून केकेआरकडून खेळत आहे. मागच्या पर्वात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे होते. केकेआरकडून सुनील नरीन डावाची सुरुवात करेल यात काही शंका नाही. मागच्या पर्वात त्याने आपली ताकद दाखवून दिली आहे. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो आणि त्यांचं कंबरडं मोडण्याची ताकद ठेवतो. पॉवरप्लेमध्येच नरीन सामना हातून खेचून घेतो. तसेच फिरकीने फलंदाजांना एक कठीण आव्हान देखील देतो. सुनील नरीन पहिल्या सामन्यात आरसीबीसाठी खूप धोकादायक बनण्याची संधी आहे.

आंद्रे रसेल : आंद्रे रसेलसारखा आक्रमक फलंदाज सामना खेचून आणण्याची ताकद ठेवतो. रसेलने यापूर्वी शानदार खेळीच्या जोरावर केकेआरला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. इतकंच काय तर आयपीएलमध्ये अनेक वेळा आरसीबीविरुद्धही शानदार कामगिरी केली आहे. स्वतःच्या बळावर संघाला विजयाकडे नेण्याची क्षमता आहे. यावेळीही आरसीबीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.