AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार बदलणार! नेमकं काय झालं?

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर हार्दिक पांड्याने 8, तर सूर्यकुमार यादवने दोन सामन्यात कर्णधारपद भूषवलं. असं असताना एक बातमी समोर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार बदलणार! नेमकं काय झालं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार बदलणार, नेमकं काय झालं?Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 06, 2026 | 8:46 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर प्रत्येक सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नेट रनरेटचं गणित सुटलं आणि 14 गुणांवर सगळं येऊन ठेपलं, तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ रायपूरला रवाना झाला आहे. पण हार्दिक पांड्या मुंबईतच असल्याने वेगवेगळ्या बातम्यांना पेव फुटलं होतं. सूर्यकुमार यादवचं आरसीबीविरूद्धच्या सामन्यात कर्णधारपद भूषवेल असं सांगितलं जात आहे. पण आता नवी बातमी समोर आहे. आरसीबीविरूद्धचा सामना हार्दिक पांड्या खेळणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडची धुरा पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे येणार आहे. रविवारी आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्या फिट अँड फाईन होईल असं सांगण्यात आहे.

हार्दिक पांड्या रायपूरला संघासोबत न गेल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पण मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू अजूनही मुंबईत आहे. त्यांच्यासोबत हार्दिक पांड्या रायपूरला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिक पांड्या पाठिच्या दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. त्या दुखापतीतून हार्दिक पांड्या सावरला आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या करो या मरो या सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा धुरा सांभाळताना दिसणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर मुंबईचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे चार पैकी चारही सामने जिंकणं भाग आहे.

हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म

हार्दिक पांड्या सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकही चांगली कामगिरी केली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत फेल गेला आहे. त्याने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि 208 च्या सरासरीने 146 धावा केल्या. खरं तर त्याला खोऱ्याने धावा करण्याची संधी होती. पण फेल गेला. त्यानंतर गोलंदाजीतही पदरी निराशा पडली आहे. त्याने 8 सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या. त्यात इकोनॉमी रेट हा 11.9 प्रति षटक आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधारपदाचा कस लागला आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...