AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामेन आले आहे. या सामन्यात आरसीबीला वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक बाण्याला सामोरं जावं लागलं. त्याने दिग्गज गोलंदाजांना सोडलं नाही.

4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबीला गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलंImage Credit source: Rajasthan Royals Twitter
| Updated on: Apr 10, 2026 | 11:24 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने धावांचा पाठलाग करणं पसंत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 8 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं तसं पाहिलं तर कठीण आहे. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करणं आवश्यक होतं. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक सुरूवात केली. संघाच्या 21 धावा असताना यशस्वी जयस्वालची विकेट पडली. त्यानंतर डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने मोर्चा सांभाळला. त्याने समोर जो गोलंदाज येईल त्याला धुतलं. त्याने समोर कोणता गोलंदाज आहे याचा विचारच केला नाही. 15व्या वर्षी दिग्गज गोलंदाजांना आक्रमक खेळताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडला धुतलं. तसेच पावरप्लेमध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

वैभव सूर्यवंशीच्या नावावर विक्रम

आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने 353.33 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने दुसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगाने अर्धशतक ठोकण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. त्याने कोलकात्याविरुद्ध 2023 मध्ये 13 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्सकडून खेळताना केएल राहुलने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर युसूफ पठाणने केकेआरसाठी चेन्नईविरुद्ध 2014 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आयपीएल 2026 स्पर्धेत 15 चेंडूत दोन वेळा वैभवने अर्धशतक ठोकलं. पहिल्यांदा चेन्नईविरुद्ध आणि आरसीबीविरुद्ध अर्धशतक ठोकलं. वैभवने एका स्पर्धेत दोन वेळा 15 चेंडूत अर्धशतक ठोकत नवा विक्रम रचला आहे.

वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारला दोन चौकार मारले. त्यानंतर तिसऱ्या षटकात स्ट्राईक मिळाली आणि अभिनंदन सिंग समोर होता. त्याने या षटकात दोन चौकार आणि 1 षटकार मारला. वैभव सूर्यवंशीचा चौथ्या षटकात जोश हेझलवूडशी सामना झाला. या षटकात त्याने सलग तीन चौकार आणि एक षटकार मारला. पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमार समोर आला. या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार मारले.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.