AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्यूशनच्या रस्त्यामध्ये क्रिकेटवर प्रेम, आठवीचं निकालपत्र कायमचं दुश्मन, 23 वर्षीय इंद्राणीचा आता फक्त धमाका सुरु…!

हिंदीमध्ये असं म्हण आहे, इरादों में दम हो तो रुकावटों को रुख मोडना ही पडता हैं...! अशीच काहीशी कहाणी आहे झारखंडची जिगरबाज क्रिकेटपटू बंगाली बाला इंद्राणी रॉय हिची... (Jharkhand Indrani Roy two hundred in domestic league)

ट्यूशनच्या रस्त्यामध्ये क्रिकेटवर प्रेम, आठवीचं निकालपत्र कायमचं दुश्मन, 23 वर्षीय इंद्राणीचा आता फक्त धमाका सुरु...!
इंद्राणी रॉय
| Updated on: May 15, 2021 | 3:10 PM
Share

मुंबई :  हिंदीमध्ये असं म्हण आहे, इरादों में दम हो तो रुकावटों को रुख मोडना ही पडता हैं…! अशीच काहीशी कहाणी आहे झारखंडची (Jharkhand) जिगरबाज क्रिकेटपटू बंगाली बाला इंद्राणी रॉय (Indrani Roy) हिची…. झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या इंद्राणीचा सध्या धमाका सुरु आहे. तिने आपल्या खेळीने निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. इंद्राणीसाठी क्रिकेट खेळणं एवढं सोपं नव्हतं. घरचं वातावरण अनुकुल नसताना तिने क्रिकेटच्या ग्राऊंडकडे आपला मोर्चा वळवला आणि पुढे जाऊन देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ओळख बनविली. (Jharkhand Indrani Roy two hundred in domestic league)

लहानपणापासूनच इंद्राणीला क्रिकेटमध्ये रस होता, क्रिकेटवर प्रेम होतं. पण, क्रिकेटवर प्रेम होण्यात तिच्या ट्यूशनला जाण्याच्या रस्त्याचा मोठा वाटा राहिला. इंद्राणी त्यावेळेस आठवीत शिकत होती. ट्यूशनला जाताना रस्त्यात तिला क्रिकेटचं मोठं मैदान लागायचं. काही मुली त्या ग्राऊंडवर प्रॅक्टिस कराताना इंद्राणीला दिसायच्या. इंद्राणी हरखून जायची. आपणही असं क्रिकेट खेळावं, सराव करावा असं तिला वाटायचं. हळूहळू तिने क्रिकेटमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. 15 व्या वर्षी तिचं बॅट आणि बॉलवर प्रेम जडलं

आठवीच्या रिपोर्टकार्डने क्रिकेटच्या स्वप्नांवर पाणी

इंद्राणीने जसा क्रिकेटमध्ये रस घेतला तसंतसं तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. दिवस-दिवस ती क्रिकेटच्या मैदानावर सराव करायची. कोचकडून क्रिकेटचे बारकावे समजून घ्यायचे. शेवटी तेच झालं, जे होणार होतं. आठवीचा निकाल लागला आणि इंद्राणीला अगदी 50 टक्क्यांहून कमी मार्क मिळाले.

वडिलांनी इंद्राणीचं क्रिकेट बंद केलं

आठवीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा इंद्राणीला कमी मार्क पडले, तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं क्रिकेट खेळणं बंद केलं. इथून पुढे क्रिकेट खेळायचं नाही, फक्त अभ्यास करायचा, असा दम तिच्या वडिलांनी तिला भरला. जवळपास दीड वर्ष तिचं क्रिकेट बंद होतं.

यादरम्यान क्रिकेट जरी बंद होतं, पण इंद्राणीने मैदानावरील निरीक्षण सोडलं नव्हतं. या काळात दुसऱ्या मुलींना कोच कसे मार्गदर्शन करतात, कोणते बारकावे सांगतात, याच्यावर इंद्राणी लक्ष ठेवून असायची.

कोचसाहेबांनी वळवलं इंद्राणीच्या वडिलांचं मन

तिला नेहमी मदत करणारे कोच पाचू गोपाल माझी यांनी इंद्राणीच्या वडिलांचं मन वळविण्याचं ठरवलं. एके दिवशी ते इंद्राणीच्या घरी गेले आणि तिच्या वडिलांना समजावलं. वडिलांनीही कोचसाहेबांची गोष्ट मानली. मग मात्र इंद्राणीने मागे वळून पाहिलं नाही.

झारखंडकडून इंद्राणीचा धमाका

23 वर्षीय विकेट कीपर फलंदाज इंद्राणीचा सध्या धमाका सुरु आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने आपल्या खेळाने छाप सोडलीय. झारखंडकडून खेळताना इंद्राणीने मागील 8 सामन्यात 2 दणदणीत शतके ठोकून 456 धावा केल्या आहेत. तिने आपल्या स्फोटक खेळीने मोठ्या टूर्नामेंटची अंतिम फेरीही गाठली आहे.

Jharkhand Indrani Roy two hundred in domestic league

हे ही वाचा :

गौतमपुढे ‘गंभीर’ समस्या, एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

क्रिकेटपटूंना अतिआत्मविश्वास नडला अन् इथेच कोरोनाने डाव साधला, पाहा IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री कशी झाली…

कोहली बाबर आझमच्या ‘एक पाऊल पुढे’, पाकिस्तानच्या दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.