AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोफ्रा आर्चरचं टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यापूर्वी खुलं चॅलेंज! म्हणाला…

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने भारताने 7 गडी राखून जिंकला. यासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण हा विजय नशिबाने मिळाल्याचं वक्तव्य इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने केलं आहे. तसेच पुढच्या सामन्यात 40 वर 6 विकेट अशी स्थिती असेल असं सांगायलाही विसरला नाही.

जोफ्रा आर्चरचं टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यापूर्वी खुलं चॅलेंज! म्हणाला...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 24, 2025 | 4:00 PM
Share

कोलकात्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. खरं तर या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतला. मात्र दारूण पराभव झाल्यानंतरही इंग्लंडच्या गोलंदाजाच्या डोक्यात भलतंच सुरु आहे. हा विजय भारताला नशिबाने मिळाला असं बेताल वक्तव्य इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने केलं आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात टीम इंडियाला जागा दाखवू असं आव्हानही दिलं आहे. जोफ्रा आर्चर म्हणाला की, ‘कोलकात्याची स्थिती गोलंदाज म्हणून माझ्यासाठी अनुकूल होती. आमच्या दुसऱ्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. पण भारताचे फलंदाज नशिबवान होते. त्यांनी जे काही उत्तुंग फटके मारले ते अशा जागी पडले तिथे खेळाडू नव्हते. पुढच्या सामन्यात आम्ही झेल पकडू आणि भारताची 40 धावांवर 6 विकेट अशी स्थिती करू.’ या सामन्यात अभिषेक शर्माचा झेल सुटला आणि तिलक वर्माविरुद्ध काही संधी निर्माण झाल्या होत्या. इंग्लंडकडून आर्चरने 4 षटकात 21 धावा देत 2 बळी घेतले.

पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 132 धावांवर गारद झाला होता. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 68 धावा केल्या होत्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 बळी घेतले.प्रत्युत्तरात अभिषेकच्या (79) खेळीमुळे भारताने 12.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ‘भारतात फलंदाज गोलंदाजांवर वरचढ होतात. असं अनेकदा आयपीएलमध्ये पाहिलं गेलं आहे. त्यामुळे गोलंदाजांना मेहनत करावी लागते.’ असं जोफ्रा आर्चर म्हणाला. जर कोलकात्यात काही विकेट झटपट बाद करण्यात यश मिळालं असतं नक्कीच विजय मिळवू शकलो असतो, असं सांगण्यासही तो विसरला नाही.

दुसरा टी20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. आता मालिकेतील दुसरा टी20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. इंग्लंडला टी20 मालिकेत कमबॅक करण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. अन्यथा मालिकेत कमबॅक करणं खूपच कठीण होईल. 2012 पासून भारतीय टी20 मालिकेत इंग्लंडवर भारी पडला आहे.

चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत...
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत....
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.