AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप विजेत्या संघासाठी BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लतादीदींनी दिलेला मदतीचा हात

तो काळ होता जेव्हा 1983 चा. जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून भारतात परतत होता. खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांना बक्षीस दिलं जाणार होतं. परंतु बीसीसीआयकडे त्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा लता मंगेशकर यांनी विश्वचषक विजयाचा आपला आनंद कृतीतून व्यक्त केला.

वर्ल्डकप विजेत्या संघासाठी BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लतादीदींनी दिलेला मदतीचा हात
Lata Mangeshkar
| Updated on: Feb 06, 2022 | 12:43 PM
Share

मुंबई : गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला (Lata Mangeshkar Passed Away). मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. लता मंगेशकर त्यांच्या मृदू स्वभावासाठी ओळखल्या जायच्या, त्या हळव्या मनाच्या होत्या. लता दीदींचं मन मोठं होतं. याच्याशी संबंधित एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लता मंगेशकर यांनी एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) खेळाडूंच्या पुरस्कारासाटी निधी उभारण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी बीसीसीआयकडे आपल्या चमकदार क्रिकेटपटूंना बक्षीस देण्यासाठी पुरेसे पैसा नव्हते. त्यामुळे लतादीदींनी मदतीचा हात पुढे केला होता.

खरे तर लता मंगेशकर यांना क्रिकेट पाहण्याची आवड आहे, त्यामुळे त्यांच्या मनात क्रिकेट आणि खेळाडूंसाठी विशेष स्थान आहे. तो काळ होता जेव्हा 1983 चा. जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून भारतात परतत होता. खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांना बक्षीस दिलं जाणार होतं. परंतु बीसीसीआयकडे त्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा लता मंगेशकर यांनी विश्वचषक विजयाचा आपला आनंद कृतीतून व्यक्त केला.

…आणि लता मंगेशकरांनी बीसीसीआयला मदत केली

दिवंगत रणजीपटू समर सिंह आणि हर्षवर्धन यांच्या बायोग्राफीनुसार, माजी केंद्रीय मंत्री एन. के. पी. साळवे यांनी खुलासा केला होता की, 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला बक्षीस देण्याची वेळ आली होती, पण त्यावेळी बोर्डाकडे पैसे नव्हते. 1982-85 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या साळवे यांच्या म्हणण्यानुसार, “त्यावेळी सर्वजण खूप नाराज होते. अशा परिस्थितीत या कामासाठी पैसे उभे करण्याची कल्पना राजसिंह डुंगरपूर यांना सुचली. त्यासाठी त्यांनी लता मंगेशकर यांना दिल्लीत कॉन्सर्ट करण्याची विनंती केली. कारण त्या काळात बीसीसीआयकडे निधी नव्हता.

लता मंगेशकरांचं मोठं मन

साळवे म्हणाले, “लताजींना जेव्हा ही ऑफर दिली तेव्हा त्यांनी लगेच ती मान्य केली. त्यावेळी लताजींनी बीसीसीआयला खेळाडूंच्या बक्षीसाची रक्कम वाढवण्यास मदत केली. ज्यामधून विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले गेले. 1983 च्या काळात काळात रक्कम खूप मोठी होती. बक्षीसाची रक्कम पाहून खेळाडूंनाही खूप आनंद झाला होता.

इतर बातम्या

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.