AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : संजीव गोयंकांसह चर्चेनंतर केएलला नेतृत्व सोडावं लागणार? कोचने म्हटलं…

Sanjiv Goenka KL Rahul Controversy : लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायजीचे मालक संजीव गोयंका आणि कॅप्टन केएल राहुल या दोघांमध्ये झालेल्या चर्चेबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे.

IPL 2024 : संजीव गोयंकांसह चर्चेनंतर केएलला नेतृत्व सोडावं लागणार? कोचने म्हटलं...
K L RAHUL LSGImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 13, 2024 | 9:43 PM
Share

केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्सला 8 मे रोजी सनरायजर्स हैदराबादकडून 10 विकेट्सने लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल या दोघांमध्ये झालेली चर्चा सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरलाय. संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. हैदराबादकडून 10 विकेट्सने झालेल्या पराभवामुळे गोयंका संतप्त झाल्याचं व्हीडिओ पाहिल्यानंतर वाटतं. इतकंच काय, तर केएल राहुलऐवजी कॅप्टन म्हणून दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जात असल्याचंही म्हटलं जात आहे. याबाबत लखनऊकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या सर्व प्रकारानंतर लखनऊचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी सर्व काही सांगून टाकलंय.

लखनऊ सुपर जायंट्स 8 मे नंतर आपला पुढील सामना हा 14 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी सोमवारी पत्रकार परिषदेत क्लुसनर यांनी सर्व काही स्पष्ट केलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, “2 क्रिकेट चाहत्यांमध्ये झालेल्या चर्चेत काहीच समस्या दिसून येत नाही. आमच्यासाठी हा प्रकार म्हणजे राईचा पर्वत केल्यासारखा आहे. ही काही मोठी गोष्ट नाही”, असं क्लुसनर म्हणाले.

तो व्हायरल व्हीडिओ

कॅप्टन बदलणार का?

केएल राहुलला कॅप्टन्सी सोडावी लागणार का? या चर्चेवरही क्लूसनर यांनी प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम लावला. तसेच लखनऊची कामगिरी अपेक्षेनुसार कामगिरी करता न आल्याचंही क्लूसनर यांनी मान्य केलं. मात्र यानंतरही क्लूजनर यांना बदलाची अपेक्षा आहे. “आरसीबीने जे केलंय, तेच आम्हाला करावं लागेल. टीमसाठी हे शक्य आहे. कॅप्टन म्हणून केएलसाठी हा हंगाम अवघड राहिला. आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही, जितकी अपेक्षित होती”, असंही क्लूसनर यांनी मान्य केलं.

लान्स क्लूसनर काय म्हणाले?

दरम्यान लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. लखनऊची या हंगामात आतापर्यंतची कामगिरी ही 50-50 अशी राहिली आहे. लखनऊने 6 सामने जिंकलेत आणि तितकेच गमावलेत. लखनऊच्या खात्यात 12 पॉइंट्स आहेत आणि नेट रनरेट हा -0.769 असा आहे. लखनऊला प्लेऑफच्या आशा कायम राखाच्या असतील तर त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतरही लखनऊचं समीकरण हे दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

Follow Us
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही...
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...