AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय मांजरेकरांच्या ऑलटाइम ग्रेट कर्णधारांमध्ये कोहलीला स्थान नाही, त्यांनी सांगितलं त्यामागचं कारण…

पण तरीही भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay manjrekar) यांनी भारताच्या सार्वकालीन महान क्रिकेट कर्णधारांच्या यादीत कोहलीचा समावेश केलेला नाही.

संजय मांजरेकरांच्या ऑलटाइम ग्रेट कर्णधारांमध्ये कोहलीला स्थान नाही, त्यांनी सांगितलं त्यामागचं कारण...
ALL PHOTOS AFP
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 4:14 PM
Share

मुंबई: कसोटी क्रिकेटमधल्या (Test cricket) आकडेवारीवरुन विराट कोहली (Virat kohli) आतापर्यंतचा भारताचा टेस्टमधला सर्वोत्तम कर्णधार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या यादीत कोहली चौथ्या स्थानावर आहे. पण तरीही भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay manjrekar) यांनी भारताच्या सार्वकालीन महान क्रिकेट कर्णधारांच्या यादीत कोहलीचा समावेश केलेला नाही. न्यूज 18 दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर यांनी त्यांच्या या निवडीमागचं कारण समजावून सांगितलं. एमएस धोनीला सर्वोत्तम भारतीय कर्णधारामध्ये त्यांनी पहिल्या स्थानावर ठेवलं आहे. एखाद्या कर्णधाराबद्दल मत बनवताना आयसीसी स्पर्धांमधील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरते, असे त्यांनी सांगितले. धोनीने भारतासाठी एक नाही, तर तीन ICC स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवून दिली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप, 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पिय़न्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.

“एमएस धोनी भारताचा एक महान कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयसीसी स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर मी कर्णधारांच मुल्यमापन केलं. कारण त्यावेळीच खरी परीक्षा असते. ज्यावेळी दोन देशांमध्ये क्रिकेट सामने खेळले जातात. त्यावेळी तुम्ही ऑफिसला जात आणि परत येता. तिथे जास्त दबाव नसतो. पण आयसीसी स्पर्धांमध्ये धोनीची कामगिरी खूप मोठी आहे” असे मांजेरकर यांनी सांगितले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभव झाला. 2019 वर्ल्डकपच्या सेमीफायनल आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि टी-20 वर्ल्डकपच्या साखळीतच भारताला गाशा गुंडाळावा लागला. “कोहलीच्या कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचे त्यांनी कौतुक केलं. कर्णधार म्हणून त्याने उदहारण सादर केलं. पण अपेक्षित निकाल कोहलीच्या बाजूने लागला नाही” याकडे मांजरेकर यांनी लक्ष वेधलं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली