AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : तर विराट कोहली कसोटी निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, माजी कर्णधाराचा दावा

Virat Kohli Test Cricket Retirement : विराट कोहली याने 12 मे रोजी सोशल मीडियावरुन पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. मात्र विराट हा निर्णय बदलू शकतो, असा दावा माजी कर्णधाराने केला आहे.

IND vs ENG : तर विराट कोहली कसोटी निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, माजी कर्णधाराचा दावा
Virat Kohli and Gautam Gambhir Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2025 | 11:08 PM
Share

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने अवघ्या काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराटने एकाएकी निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा झटका लागला. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने मोठा दावा केला आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, असं क्लार्कने म्हटलं आहे. मात्र विराट असं फक्त एकाच स्थितीत करु शकतो, असंही क्लार्कने म्हटलं. आता क्लार्कने विराटबाबत नक्की काय म्हटलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.

मायकल क्लार्क काय म्हणाला?

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका 0-5 अशा एकतर्फी फरकाने गमावली तर विराट निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो. विराट टेस्ट क्रिकेटवर फार प्रेम करतो. तसेच विराटचं कसोटी क्रिकेटप्रती असलेलं समर्पण हे अद्भुत आहे. तसेच विराट आणि रोहित शर्मा या दोघांशिवायही भारतीय संघ चांगला आहे. या दोघांशिवायही टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जिंकू शकते, असंही क्लार्कने म्हटलं.

विराट आणि रोहितची निवृत्ती

कर्णधार रोहित आणि विराट या दोघांनी अवघ्या काही दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. विराट आणि रोहित या दोघांनी गेल्या दशकापासून कसोटी क्रिकेटमध्ये योगदान दिलं. दोघेही कसोटी संघाचे प्रमुख खेळाडू होते. तसेच विराट आणि रोहित दोघांनीही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2024 साली टी 20I क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता विराट आणि रोहित दोघेही फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत.

विराट आणि रोहितची आकडेवारी

विराटने टीम इंडियाचं 123 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. विराटने 46.85 च्या सरासरीने आणि 55.57 च्या स्ट्राईक रेटने 9 हजार 230 धावा केल्या. विराटने या दरम्यान 30 शतकं आणि 71 अर्धशतकं झळकावली. विराटची नाबाद 254 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर दुसऱ्या बाजूला रोहितने 67 सामन्यांमध्ये 40 पेक्षा अधिकच्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या. रोहितने टेस्टमध्ये 12 शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली. रोहितचा टेस्टमधील 212 हा बेस्ट स्कोअर होता.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

दरम्यान टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान 5 कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली मालिका असणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Follow Us
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.