AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता लेग साइडला जाणारा प्रत्येक बॉल वाइड नसेल, नवा नियम लागू; कसं काय ते जाणून घ्या

भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरु असताना आता आणखी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लेग साइडला जाणारा प्रत्येक चेंडू आता वाइड नसेल. त्यासाठी एक नियम आखून देण्यात आला आहे. काय ते जाणून घेऊयात..

आता लेग साइडला जाणारा प्रत्येक बॉल वाइड नसेल, नवा नियम लागू; कसं काय ते जाणून घ्या
आता लेग साइडला जाणारा प्रत्येक बॉल वाइड नसेल, नवा नियम लागू; कसं काय ते जाणून घ्याImage Credit source: Screengrabs via ICC
| Updated on: Oct 24, 2025 | 6:38 PM
Share

क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल करण्यात आले आहेत. क्रिकेटमधील प्रत्येक निर्णय अचूक असावा यासाठी काळजी घेतली गेली आहे. गेल्या काही वर्षात लेग साईडला जाणारा चेंडू हा वाइड दिला जात होता. त्यामुळे गोलंदाजांना चेंडू टाकण्यासाठी खूपच काळजी घ्यावी लागत होती. आता त्यासाठी नियम आखून देण्यात आला आहे. वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूसाठी एक लाईन ठरवून दिली होती. त्यानुसार पंच निर्णय घेत होते. अगदी तसाच नियम आता लेग साइडला जाणाऱ्या चेंडूसाठी असणार आहे. आता अशीच एक लाइन लेग साईडला असणार आहे. चेंडू या लाइनच्या आत असेल तर वाइड दिला जाणार नाही. यापूर्वी लेग साइडला जाणारा प्रत्येक चेंडू हा वाइड दिला जात होता. पण आता या नियमात बदल केला आहे. त्यामुळे गोलंदाजांना रणनिती आखण्यास आणखी मदत मिळणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेपासून हा नियम लागू होणार आहे.

आयसीसीच्या नियमाचा गोलंदाजांना फायदा होणार आहे. कारण फलंदाज क्रिजवर मूव्ह केल्यानंतर गोलंदाज त्यांना चकवा देत चेंडू लेग साइड बाहेर टाकत होते. पण हा चेंडू वाइड दिल्याने गोलंदाजांचा हिरमोड व्हायचा. आता गोलंदाजांना त्यातल्या त्यात दिलासा मिळणार आहे. ऑफ स्टंपला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्नात असलेल्या फलंदाजांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण गोलंदाज आता नव्या नियमाचा वापर करत फलंदाजांना फसवू शकतात.

दुसरीकडे, भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत तुम्ही पाहीलं असेल की फलंदाजांना धावा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण दोन चेंडूंच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे फलंदाजांना बेधडक धावा करण्यात अडचण येत आहे. वनडे क्रिकेटमध्ये 34 षटकांपर्यंत दोन नवे चेंडू वापरल जात आहेत. पण त्यानंतर 16 षटकांपर्यंत एकच चेंडू असेल. त्यामुळे गोलंदाजांना फायदा मिळणार आहे. कारण रिव्हर्स स्विंगमुळे फलंदाजी करण्यास अडचणींचा सामना करावा लागेल.

सीमेरेषेजवळ झेल पकडण्याचा नियमातही बदल करण्यात आला आहे. जर खेळाडू सीमेपार जात झेल घेत असेल तर त्याला चेंडूसोबत एकदाच उडी मारता येणार आहे. अन्यथा हा झेल अवैध मानला जाईल.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.