AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL : श्रीलंकेच्या 8 खेळाडूंचा इस्लामाबाद स्फोटानंतर पाकिस्तान सोडण्याचा निर्णय; सामनाही रद्द!

श्रीलंका क्रिकेट टीमसोबत 2009 साली पाकिस्तान दौऱ्यात काय झालं होतं हे साऱ्या क्रिकेट विश्वाने पाहिलं होतं. मात्र त्यानंतरही क्रिकेट बोर्डाने श्रीलंका टीमला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवलं. मात्र आता खेळाडूंवर सुरक्षेच्या कारणामुळे दौरा अर्धवट सोडून परण्याती वेळ ओढावली आहे.

PAK vs SL : श्रीलंकेच्या 8 खेळाडूंचा इस्लामाबाद स्फोटानंतर पाकिस्तान सोडण्याचा निर्णय; सामनाही रद्द!
Sri Lanka Tour Of Pakistan 2025Image Credit source: PTI
| Updated on: Nov 13, 2025 | 1:33 AM
Share

खेळाडूंच्या सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याने आणि ताणलेल्या संबंधांनंतर बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये का पाठवत नाही? हे श्रीलंका क्रिकेट टीमला आता चांगलंच समजलं असेल. श्रीलंका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. मात्र श्रीलंका संघातील 8 खेळाडूंनी दौरा अर्धवट सोडल्याचं समोर आलं आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या अशा घटनेनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर आता श्रीलंकेच्या 8 खेळाडूंनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार श्रीलंका टीम गुरुवारी 13 नोव्हेंबरला पाकिस्तान सोडणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दुसरा सामना रद्द!

श्रीलंकेच्या खेळाडूंनी घेतलेल्या निर्णयामुळे रावळपिंडीत होणारा दुसरा एकदिवसीय सामना हा रद्द झाल्यात जमा आहे. पाकिस्तानने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने श्रीलंकेवर मंगळवारी 11 नोव्हेंबरला 6 धावांनी मात केली होती. मात्र आता श्रीलंकेच्या खेळाडूंनी घेतलेल्या निर्णयामुळे दुसरा सामना रद्द झाल्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे. दुसरा सामनाही रावळपिंडी इथे होणार आहे. मात्र इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये फार अंतर नाही. त्यामुळे खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

कहर म्हणजे इतकं होऊनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये पाठवणार असल्याचं म्हटलं जात आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्ड मायदेशी परतणाऱ्या 8 खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीमची वनडे सीरिजनंतर पाकिस्तान आणि झिंबाब्वे विरुद्ध टी 20I ट्राय सीरिज नियोजित आहे. आता या ट्राय सीरिजबाबत काय निर्णय होणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

श्रीलंकेचे डोळे कधी उघडणार?

दरम्यान याआधी 2009 साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या तत्कालीन श्रीलंका क्रिकेट टीममधील खेळाडूंची सुरक्षा धोक्यात आली होती. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये कर्णधार महिला जयवर्धने, चामिंडा वास, अजंता मेंडीस आणि इतर खेळाडूंना दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे जवान शहीद झाले होते. त्यानंतर 10 वर्ष कोणत्याच संघाने पाकिस्तान दौरा केला नाही. मात्र 2019 साली पुन्हा श्रीलंकेने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याचं धाडस दाखवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानामध्ये खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेवर सुरक्षेमुळे दौरा अर्धवट सोडून परतण्याची नामुष्की ओढावलीय. त्यामुळे 2 अनुभवानंतर तरी श्रीलंका खेळाडूंच्या सुरक्षेसोबतची तडजोड करणं थांबवणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…