AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinesh Karthik : 16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळले, तिसऱ्यांदा ठरला सामनावीर, दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीविषयी जाणून घ्या…

कार्तिक पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर ठरला. हा सामना 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला गेला होता.

Dinesh Karthik : 16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळले, तिसऱ्यांदा ठरला सामनावीर, दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीविषयी जाणून घ्या...
दिनेश कार्तिकImage Credit source: social
| Updated on: Jun 18, 2022 | 7:58 AM
Share

नवी दिल्ली : काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (SA) भारतानं पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलंय. भारताच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 17 षटकात 87 धावातच आटोपला. या मोठ्या फरकानं भारतानं विजय संपादन केलाय.  आता रविवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. 37 वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) चौथ्या सामन्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. कार्तिकला त्याच्या जोरदार खेळीसाठी सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलंय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं एका वेळी 13 षटकांत केवळ 81 धावा केल्या होत्या. चार विकेट गमावल्या होत्या. ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर आणि कर्णधार ऋषभ पंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर कार्तिकने हार्दिक पांड्यासोबत टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. कालच्या सामन्यात सगळीकडे दिनेशचीच चर्चा होती.

आयसीसीचं ट्विट

16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळले

दिनेश कार्तिक आपल्या 16 वर्षांच्या T20 कारकिर्दीत केवळ तीनदाच सामनावीर ठरला आहे. हे तीन सामने भारतासाठी महत्त्वाचे किंवा करा किंवा मरोचे सामने होते. या तीन सामन्यांमध्ये कार्तिकने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला.

दिनेशची कारकिर्द जाणून घ्या…

कार्तिक पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर ठरला. हा सामना 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला गेला होता. कार्तिकने 2018 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. हा सामना निदाहास ट्रॉफीचा अंतिम सामना होता. निदाहस करंडक स्पर्धेत तीन संघ सहभागी झाले होते. श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीतून बाद झाला. भारतासमोर बांगलादेशचे आव्हान होते. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला. बांगलादेशने 20 षटकांत 8 विकेट गमावून 166 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 18 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा केल्या. शेवटच्या दोन षटकात टीम इंडियाला विजयासाठी 34 धावांची गरज होती. तेव्हा दिनेश कार्तिकसह विजय शंकर क्रीजवर उपस्थित होता. 19व्या षटकात रुबेल हुसैनच्या तीन चेंडूंवर कार्तिकने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला. 19व्या षटकात कार्तिकने 22 धावा देत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन केले.

काल दिनेशची खेळी जोरदार

शुक्रवारच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झालं तर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 169 धावा केल्या. कार्तिकनं 27 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. कार्तिकच्या झटपट खेळीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत 73 धावा जोडल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला टी-20 मधील सर्वात कमी धावसंख्येवर रोखले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.