AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयच्या ‘त्या’ नियमाचा इशान किशन आणि हार्दिक पांड्याला बसणार फटका! आता संघात पुनरामगन करणं कठीण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. संघाच्या बांधणीपासून येणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्डकपसाठी बीसीसीआय मोर्चेबांधणी करत आहे. पण काही खेळाडूंचं वागणं बीसीसीआयच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. खेळाडू व्यवसायिक आणि शॉर्ट क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रीत असल्याने बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआयच्या 'त्या' नियमाचा इशान किशन आणि हार्दिक पांड्याला बसणार फटका! आता संघात पुनरामगन करणं कठीण
बीसीसीआय 'त्या' वृत्तीविरोधात उचलणार कठोर पाऊल, इशान किशन आणि हार्दिक पांड्या रडारवर
| Updated on: Feb 13, 2024 | 4:23 PM
Share

मुंबई : टी20 फॉर्मेटनंतर कसोटी क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला हे कोणीही क्रिकेट जाणकार सांगेल. कसोटी क्रिकेटला नव संजीवनी देण्यासाठी वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिप सुरु केली आहे. दुसरीकडे, टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. पाच दिवस खेळणं खेळाडूंच्या जीवावर येतं असाच एक मतप्रवाह तयार होताना दिसत आहे. त्या तुलनेत क्रिकेटच्या शॉर्ट फॉर्मेटमध्ये बऱ्यापैकी पैसा आहे. तसेच चौकार आणि षटकरांच्या आतषबाजीमुळे क्रिकेटरसिकांची ओढही जास्त आहे. त्यामुळे जगभरात अनेक टी20 क्रिकेट लीगचा भरणा झाला आहे. पण भारतीय खेळाडूंच्या बाबतीत या उलट आहे. भारतीय खेळाडूंना आयपीएल वगळता इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. पण असं असूनही भारतीय खेळाडूंचं देशांतर्गत क्रिकेटपेक्षा दुर्लक्ष होताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलकडे लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. आता अशा खेळाडूंना लगाम लावण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचललं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, काही खेळाडूंनी देशांर्गत क्रिकेटऐवजी आयपीएलची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंचं हे वागणं पाहून बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. टाइम इंडियाच्या वृत्तानुसार, खेळाडूंना आता रणजी ट्रॉफी खेळावीच लागणार आहे. फक्त दुखापतीतून सावरणाऱ्या खेळाडूंना यातून सूट देण्यात आली आहे. जानेवारीपासून आयपीएल मोडमध्ये गेलेल्या खेळाडूंवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. . बीसीसीआयचा हा निर्णय इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि दीपक चहर यांच्यासाठी आहे. हे खेळाडू फीट होऊनही आपापल्या राज्य संघाकडून खेळत नाहीत.

रणजी स्पर्धेच्या गट फेरीतील शेवटचा सामना 16 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीपासून बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. इशान किशन बडोदामध्ये ट्रेनिंग करत आहे. तर कृणाल पांड्या आणि दीपक चहर खेळत नाही. तर हार्दिक पांड्याही दुखापतीतून सावरल्याचं दिसत आहे. सोशल मीडियातील व्हिडीओतून ही बाब समोर आली आहे. हार्दिकने अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंना सावध करण्याचा आणि देशांतर्गत सामने खेळल्याशिवाय संघात परत न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं..
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र...
तर आनंद दिघेंनी निरुपम यांच्या कानाखाली खेचली असती...शिंदे मात्र....
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका.
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने.
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.