AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना थांबवला, मैदानात ब्लॅकआऊट

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना धर्मशाळेत सुरु आहे. हा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु होता. मात्र पाकिस्तानने हल्ले सुरु केल्याने हा सामना थांबवण्यात आला आहे.

मोठी बातमी! पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना थांबवला, मैदानात ब्लॅकआऊट
धर्मशाळाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 08, 2025 | 10:11 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना  थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार हल्ले होत आहेत. यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून हा सामना थांबवण्यात आला आहे. हा सामना सीमेपासून 150 किमी दूर असलेल्या धर्मशाळेत सुरु होता. पण या मैदानावर हल्ला होऊ शकतो. या अनुषंगाने हा सामना थांबवण्यात आला अशी माहिती मिळत आहे.  लाईट्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे, अशी माहिती सुरुवातीला सांगत होते. पण मीडिया रिपोर्टनुसार, सीमेवरील स्थिती पाहता हा निर्णय घेतला. आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. 10.1 षटकांचा खेळ झाला होता. पंजाब किंग्सने 1 गडी गमवून 122 धावा केल्या होत्या. तितक्यात मैदानात ब्लॅकआऊट झाला आणि सामना थांबवण्यात आला.  आता हा सामना रद्द करण्यात आल्याची आता माहिती समोर आली आहे.  सद्यस्थिती पाहता सीमेलगत असलेल्या शहरात एकापाठोपाठ एक ब्लॅकआऊट केला जात आहे. तसेच पाकिस्तानकडून होणारे हल्ले भारताकडून परतवून लावले जात आहे. एअर डिफेंस सिस्टमच्या माध्यमातून सर्व हल्ले निष्फळ केले आहेत.

दरम्यान, मैदानावरील फ्लडलाइट्स पहिल्यांदा 9 वाजून 29 मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जाताना दिसले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आयपीएल अधिकाऱ्यांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले. यानंतर सामना थांबवण्यात आला आणि प्रेक्षकांना स्टेडियम रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी घेतली. हा सामना पावसामुळे एक तास उशिराने सुरु झाला होता. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 122 धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्यची विकेट पडली आणि श्रेयस अय्यर मैदानात आला. पण तेव्हाच सामना थांबवण्यात आला. प्रियांश आर्यने 34 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकार मारत 70 धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने 28 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?