AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराह नकोच…! प्रश्न विचारताच रवी शास्त्री यांनी हात जोडले, स्पष्ट सांगितलं की…

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून सामन्यांचं समालोचन करत आहेत. यावेळी त्यांना जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी याबाबत आपलं रोखठोक म्हणणं मांडलं.

जसप्रीत बुमराह नकोच...! प्रश्न विचारताच रवी शास्त्री यांनी हात जोडले, स्पष्ट सांगितलं की...
जसप्रीत बुमराह नकोच...! प्रश्न विचारताच रवी शास्त्री यांनी हात जोडले, स्पष्ट सांगितलं की...Image Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2025 | 4:41 PM
Share

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीबाबत आपलं रोखठोक म्हणणं मांडलं आहे. रवी शास्त्री ह 2017 ते 2021 या कालावधीत टीम इंडियाच प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने अनेक चांगल्या कामगिरी केल्या. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघातील अनेक खेळाडू घडले आहेत. त्यामुळे त्यांना विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा सहवास लाभला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबतचा खुलासा केला. तसेच जसप्रीत बुमराह नको रे बाबा असा सूर देखील लावला. तसेच विराट कोहलीबाबत एक मोठं विधानही त्यांनी केलं. विराट कोहलीने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर जसप्रीत बुमराह इंग्लंडमध्ये खेळत आहे. असं असताना रवी शास्त्री यांच्या मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रवी शास्त्री यांना एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. हा व्हिडीओ स्टिक टू क्रिकेटने पोस्ट केला आहे. तसेच रवी शास्त्री यांनीही रिट्वीत केला आहे. रवी शास्त्री यांना विचारलं गेलं की, सध्या कोणता असा गोलंदाज आहे की त्याचा सामना करायला तुम्हाला आवडणार नाही? किंवा त्याचा सामना करणं टाळाल? रवी शास्त्री यांनी क्षणाचाही विलंब न करता जसप्रीत बुमराह याचं नाव घेतलं. जसप्रीत बुमराह सध्याच्या काळातील सर्वात घातक गोलंदाज आहे. त्याचा सामना करणं भल्याभल्या फलंदाजांना जमत नाही.

रवी शास्त्री यांना सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी विराट कोहलीचं नाव घेतलं. रवी शास्त्री म्हणाले की, विराट कोहली गेल्या दशकातील सर्वोत्तम खेळाडूच नाही, तर तो सर्वात प्रभावशाली खेळाडू देखील आहे. दरम्यान, विराट कोहली सध्या वनडे क्रिकेट खेळण्यास उपलब्ध आहे.

रवी शास्त्री यांनी मुलाखतीदरम्यान मिळालेल्या सर्वोत्तम सल्ल्याबाबतही सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर समालोचन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा सल्ला मिळाला होता, असं त्यांनी सांगितलं. रिची बेनॉड यांनी सांगितलं की, तुम्हाला किती शब्द बोलता याचे पैसे मिळत नाहीत तर तुम्ही काय बोलता याचे पैसे मिळतात.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा