AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असं असताना रिंकु सिंह आणि नितीश कुमार रेड्डी यांना टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणं कठीण असल्याचं दिसत आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की...
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघातून रिंकु-रेड्डीचा पत्ता कट? झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Dec 03, 2025 | 7:23 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दोन टी20 मालिकेत एकूण दहा सामने खेळणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी लिटमस टेस्ट आहेत. त्यामुळे या मालिकेत खेळणारे खेळाडूच टी20 वर्ल्डकपमध्ये खेळतील यात काही शंका नाही. यात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या संघात शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचं कमबॅक झालं आहे. दोघांनी दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन केलं आहे. शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. त्यामुळे तो संघाचा भाग असेल यात काही शंका नाही. पण त्याच्या नावापुढे स्टार लावला आहे. त्यामुळे खेळणार की नाही हे फिटनेसवर अवलंबून असेल.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियासाठी निवडलेल्या टी20 संघच कायम ठेवला आहे. हार्दिक पांड्याबाबत एकमेव बदल करण्यात आला आहे दुसरीकडे, या संघातून रिंकु सिंहला डच्चू दिला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघातही नसेल अशी आता चर्चा सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियातील टी20 मालिकेत रिंकूला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण हा सामना देखील पावसामुळे सामना रद्द झाला होता. रिंकु सिंह व्यतिरिक्त नितीश कुमार रेड्डी यालाही या संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणार नाही अशी चर्चा रंगली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही हाच संघ खेळेल यात काही शंका नाही. पण एखाद दुसरा खेळाडू जखमी झाला तर या दोघांचा विचार केला जाईल. त्यामुळे या दोन महिन्यात काय घडतं यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे सध्यातरी हाच संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धत खेळेल असंच बोललं जात आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर

तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.