AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांचं नेमकं कुठे चुकलं? कसा झाला अपघात

भारताचा क्रिकेटर ऋषभ पंत याच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात तो बचावला आहे. त्याच्या अपघाताच्या घटनेने पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांचं नेमकं कुठे चुकलं? कसा झाला अपघात
| Updated on: Dec 30, 2022 | 4:30 PM
Share

देहरादून : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला आज पहाटे अपघात ( Rishabh Pant Car Accident ) झाला. 30 डिसेंबरच्या पहाटे उत्तराखंडमधील रुरकी येथे जात असताना ऋषभ पंतच्या ( Rishabh Pant car ) कारला अपघात झाला. ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात तो बचावला. कारण गाडीला अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. पण त्याआधीच तो गाडीतून बाहेर पडला होता.

ऋषभ पंत विंडो स्क्रीन तोडून कारमधून बाहेर पडला. अपघात झालेला पाहून काही लोकं घटनास्थळी धावले. यानंतर 108 नंबरवर कॉल करुन तातडीने त्याला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.

ऋषभ पंतचे चाहते ( Rishabh Pant Fans ) तो लवकर यातून बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत. त्याच्या अपघाताची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा रात्री प्रवास करणं किती धोकादायक असू शकतं हे पुढे आलं आहे.

रात्रीच्या वेळी गाडी चालवणं टाळलं पाहिजे. कारण ही वेळ खूप महत्त्वाची असते. यावेळी कितीही झालं तरी व्यक्तीला झोप आवरणं शक्य होत नाही. पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींनी देखील जीव गमवला आहे.

ऋषभ पंतचं कुठे चुकलं?

ऋषभ पंत देखील रात्रीच्या वेळी प्रवास करत होता. त्याने प्रवासासाठी ही वेळ निवडली. इथे त्याची ही पहिली चूक झाली. त्याला लांब प्रवास करायचा होता. तर त्याने सोबत एक ड्राईव्हर ठेवला पाहिजे होता. पण तो स्वत: गाडी घेऊन एकटाच निघाला होता. इथे त्याची दुसरी चूक झाली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.