8 सामन्यात 458 धावा आणि 17 विकेट घेणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला टीम इंडियात संधी मिळणार

भारताला फेब्रुवारीमध्ये वेस्टइंडीज विरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. यावेळी भारतीय संघात ऋषी धवनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. धनवच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेशने विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. साहजिकच धवनच्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.

8 सामन्यात 458 धावा आणि 17 विकेट घेणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला टीम इंडियात संधी मिळणार
Rishi Dhawan (उजव्या बाजूला) (File Photo)
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 6:22 PM

मुंबई : भारतीय टीमच्या (Team India) वेस्ट इंडिजसोबत एकदिवसीय सामने आणि टी-20 सीरीजकडे सर्वांचे लक्ष आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच आहे. बातमीनुसार टीम इंडियामध्ये हिमाचल प्रदेशचा (Himachal Pradesh) धाकड खेळाडू ऋषी धवनचे (Rishi Dhawan) यावेळी पुनरागमन होऊ शकते. या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती. ऋषी धवन कर्णधारपदी असताना हिमाचल प्रदेशने 2021 ची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यापूर्वी ऋषी धवन भारताकडून खेळला आहे. 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो भारताकडून खेळला आहे. परंतु फारशी चमकदार कामगिरी करू न शकल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले. दी न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार निवडकर्ते ऋषी धवनला वनडे सीरिजसाठी भारतीय संघात घेऊ शकतात. अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये वेंकटेश अय्यरचा समावेश आहेच. परंतु निवडकर्त्यांना धवनला संधी द्यायची आहे.

धवनने विजय हजारे ट्राँफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. धवनने 8 मँचेसमध्ये 17 विकेट आणि 458 धावा फटकावल्या होत्या. धवन कायम फिनिशरच्या भूमिकेतच खेळताना दिसा आहे. त्यामुळे धवनची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. विजय हजारे ट्राँफीमध्ये त्याने हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या नेतृत्वात या टीमने पहिल्यांदाच कोणतीही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशने तामिळनाडूसारख्या तगड्या संघाला गारद करून विजेतेपदावर नाव कोरले.

कोण आहे ऋषी धवन?

31 वर्षीय ऋषी धवन उजव्या हाताने फलंदाजी करतो. तसेत तो मीडियम पेसर आहे. ए लिस्ट क्रिकेटमध्ये तो 109 सामने खेळला असून त्यात त्याने 2385 धावा केल्या आहेत. 2021 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचे प्रदर्शन थक्क करणारे होते. यामध्ये धवनने 127.22 च्या स्ट्राईक रेट आणि 73.33 च्या सरासरीने धावा केल्या. आठपैकी पाच सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले.

6 वर्षांनंतर धवनचे पुनरागमन

जर ऋषी धवनची भारतीय संघात निवड झाली तर तब्बल सहा वर्षांनंतर धवनचे पुनरागमन होईल. त्यांने जानेवारी 2016 मध्ये अखेरची टीम इंडियाची जर्सी घातली होती. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर खेळला होता. त्याच्या नावे 3 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यात त्याने 12 धावा केल्या आहेत आणि 1 विकेट घेतली होती. त्यामुळे धवनला टीम इंडियाच्या बाहेर जावे लागले होते. तरीही 2016 मध्ये त्याने झिम्बाब्वे भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवले. त्याला एकच संधी मिळाली. या एका सामन्यात त्याने एक धाव केली आणि एक विकेट घेतली. त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही.

इतर बातम्या

Video : बोलरची हॅट्रिक, अखेरच्या चेंडूवर षटकार किंवा विकेटची गरज, नवा फलंदाज स्ट्राईकवर; सर्वाधिक रोमांचकारी ओव्हर तुम्ही पाहिली का?

ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं

विराट कोहली अजून 2 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व करु शकला असता; द. आफ्रिकेतील पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

(Rishi Dhawan will be back in Team India after 6 years)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.