AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी मैदानात परतणार? अखेर कोडं सुटलं

बांगलादेशविरुद्धचा दौरा रद्द झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता हे दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानात उतरतील का नाही? असा प्रश्न सतावत आहे. आता त्याचं उत्तर मिळालं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी मैदानात परतणार? अखेर कोडं सुटलं
रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी मैदानात परतणार? अखेर कोडं सुटलंImage Credit source: PTI
| Updated on: Aug 06, 2025 | 8:50 PM
Share

भारतीय इंग्लंड दौऱ्यात फक्त पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिकेचं काही आयोजन नव्हतं. कारण भारतीय संघाचं वेळापत्रक आधीच ठरलं होतं. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार होता. पण आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. कारण बांगलादेशमधील स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, श्रीलंका प्रीमियर लीग पुढे ढकल्याने श्रीलंकेविरुद्ध मालिका होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यालाही पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ थेट सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धा खेळण्यास उतरणार आहे. पण ही स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेतही रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज खेळाडूंना मैदानात कधी पाहता येईल याची उत्सुकता ताणली गेली आहे. कारण दोन्ही खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी एकमेव वनडे फॉर्मेट आहे.

आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे आता दोन्ही दिग्गज खेळाडूंना मैदानात पाहण्याची ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळेल. कारण भारतीय संघ टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पण प्रश्न असा आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार की नाही. कारण टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेण्यापूर्वी रोहित शर्मा तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार होता. त्याच्या निवृत्तीनंतर टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर दिली गेली. तर कसोटी संघाची धुरा शुबमन गिलकडे सोपवली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा या दौऱ्यात नेतृत्व करणार की नाही? हा देखील प्रश्न आहे.

रोहित-विराट यांनी शेवटचा सामना आयपीएल 2025 मध्ये खेळला होता. या स्पर्धेदरम्यान दोघांनी कसोटीतून निवृत्ती घेत आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून दोन्ही दिग्गज खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. दरम्यान, आशिया कप स्पर्धेत जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आराम दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्याला कसोटी मालिकेत दुखापत झाल्याच्या वावड्याही उठल्या आहेत. मात्र त्यात कितपत तथ्य हे काही सांगता येणं कठीण आहे. बीसीसीआयने अद्याप तरी याबाबत काही सांगितलं नाही. बुमराहला आशिया कप स्पर्धेत आराम दिला गेला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करू शकतो.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.