AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पंड्याबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, कर्णधाराने सांगितलं T20 वर्ल्डकप टीममध्ये निवड कशी होणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका (India vs West Indies, 1st T20I ) बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मीडियाशी संवाद साधत पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. रोहित शर्माला हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) पुनरागमनावर आणि त्याच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर कर्णधाराने अतिशय मनोरंजक उत्तर दिले.

हार्दिक पंड्याबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, कर्णधाराने सांगितलं T20 वर्ल्डकप टीममध्ये निवड कशी होणार?
Rohit Sharma
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 3:15 PM
Share

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका (India vs West Indies, 1st T20I ) बुधवारपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मीडियाशी संवाद साधत पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. रोहित शर्माला हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) पुनरागमनावर आणि त्याच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर कर्णधाराने अतिशय मनोरंजक उत्तर दिले. रोहित शर्माने हार्दिक पंड्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना टी-20 विश्वचषकासाठी संघाची निवड कशी करणार हे देखील सांगितले. त्याचवेळी त्याने सांगितले की, संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या भूमिकेची पूर्ण माहिती देण्यात आली असून आता त्यांना त्यांची प्रतिभा दाखवावी लागेल.

रोहित शर्माला हार्दिक पंड्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘हार्दिक पंड्या हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान देतो. पंड्या फलंदाज म्हणून खेळू शकतो की नाही यावर संघ व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु प्रत्येक खेळाडूने पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) असावे, जेणेकरून आम्ही आणखी एक पाऊल टाकू शकू.

टीम इंडियात निवड कशी होणार?

रोहित शर्मा म्हणाला, “जेव्हा सर्व खेळाडू फिट असतील, तेव्हाच आम्ही पुढचं पाऊल टाकू. प्रतिस्पर्धी संघांनुसार खेळाडूंची निवड केली जाईल. टीम इंडियाची दारं सर्वांसाठी खुली आहेत.” रोहित शर्मा पुढे म्हणाला, ”आम्ही विश्वचषकासाठी झटपट निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला विश्वचषकासाठी योग्य टीम कॉम्बिनेशन शोधावे लागेल. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक मैदानाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे टीम कॉम्बिनेशन प्रत्येकाला अनुसरून पाहावे लागणार आहे. आपल्याकडे किती स्पिन आणि पेस ऑलराउंडर खेळाडू आहेत जे खालच्या क्रमांकावर उतरून चांगली फलंदाजी करू शकतात ते पाहावे लागेल. गोलंदाजांचेही तसेच आहे, परिस्थितीनुसार त्यांचा वापर केला जाईल.

खेळाडूंना त्यांचा रोल माहीत आहे : रोहित शर्मा

रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘आम्ही सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका सांगितली आहे. आता ते त्यांचे कौशल्य कसे दाखवतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. संघाला कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकतील अशा बॅकअप खेळाडूंचीही गरज आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीवरही रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा म्हणाला, ‘युझवेंद्र चहल लयीत आहे आणि कुलदीपला काही काळ दुखापत झाल्याने त्याला फॉर्ममध्ये परत यायला वेळ लागेल. रिस्ट स्पिनरला लयीत यायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला वाट पहावी लागेल. तो स्वत:वर, गोलंदाजीवर खूप काम करतोय, नेट्समध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते.

इतर बातम्या

IPL 2022 : IPL मध्ये त्याला कोणी विचारलं नाही, अखेर ‘त्या’ सौंदर्यवतीने समोर येऊन दिलं उत्तर, कोण आहे ‘ती’

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर

IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.