AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

team india : वनडे, टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन

भारतीय टीमच्या टी-20 आणि वनडे टीमची धुरा आता हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. तर रोहितकडे कसोटी क्रिकेटच्या संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आले आहे.

team india : वनडे, टी-20 संघाचा नवा कॅप्टन रोहित शर्मा, तर कसोटीतही रोहित व्हाईस कॅप्टन
रोहित शर्मा
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 08, 2021 | 8:17 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने आज मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आज टीम इंडियाच्या नव्या टी-20 आणि वनडे टीमच्या कॅप्टनची घोषणा केली आहे. विराट कोहलीचा कामाचा ताण कमी करण्यासाठी वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला होता. त्यानंतर टीम डंडियाचा टी-20 आणि वनडेत नवा कर्णधार कोण असणार यांची उत्सुक्ता सर्वांना लागली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे, कारण बीसीसीआयने नवा कर्णधार जाहीर केला आहे.

टी-20 वनडे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा

भारतीय टीमच्या टी-20 आणि वनडे टीमची धुरा आता हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. बीसीसीआयने अधिकृतरित्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे. तर रोहितकडे कसोटी क्रिकेटच्या संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळे संघ एका नव्या नेतृत्वात इथून पुढील वाटचाल करणार आहे.

नवा कोच, नवा कॅप्टन

टीम इंडियाचा अलिकडेच कोचही बदलला आहे. रवी शास्त्री पायउतार होऊन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड (द वॉल) ची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघाचा नवा कर्णधारही जाहीर करण्यात आला आहे.

रोहितची सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी

रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे. रोहितला सध्याच्या घडीचा सर्वात बेस्ट आणि स्फोटक ओपनर मानले जाते, त्याच्या नावावर अनेक उतुंग रेकॉर्ड आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. तर एका विश्वकप स्पेर्धेत 5 शतके ठोकणाराही तो जगात एकमेव खेळाडू आहे. अलिकडेच त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरीही सुधारली आहे.

ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार

विराट कोहलीच्या नावावर अनेक चांगले विक्रम आहेत. मात्र आयसीसी इव्हेंटमध्ये त्याची कामगिरी म्हणावी अशी झाली नाही. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात जिथे टीम गेली तिथे ट्रॉफी जिंकून आली आहे. शिवाय रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली आहे.

Rip bipin rawat : मधुलिका रावत यांचं देशासाठीचे हे योगदान माहीत आहे का? वाचा सविस्तर

महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला; वाचा सविस्तर नेमके काय घडले?

Aurangabad: धम्ममिशन पॅगोड्याचे ऐतिहासिक लोकार्पण, राज्यभरातील भिख्खूंच्या उपस्थितीत चढवला सोन्याचा छत्रीकळस

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली