पुणे: महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने काल विजय हजारे ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध फलंदाजी करताना विक्रम रचले. ऋतुराजने काल 159 चेंडूत 220 धावा फटकावल्या. 10 चौकार आणि 16 षटकार लगावले. त्याचबरोबर ऋतुराजने शिवा सिंह टाकत असलेल्या 49 व्या षटकात 7 षटकार लगावले.