AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Resign: संजय मांजरेकरांनी सांगितलं, विराटच कॅप्टनशिप सोडण्यामागचं नेमकं कारण…

विराटने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराटने टि्वटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली. त्याने स्टेटमेंट पोस्ट करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Virat Kohli Resign: संजय मांजरेकरांनी सांगितलं, विराटच कॅप्टनशिप सोडण्यामागचं नेमकं कारण...
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 2:04 PM
Share

मुंबई: टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. वनडेच्या कॅप्टनशिपवरुन त्याला आधीच हटवण्यात आलं आहे. विराटचा कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. त्यावर विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका (South Africa test series) 2-1 अशी गमावल्यानंतर विराटने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराटने टि्वटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली. त्याने स्टेटमेंट पोस्ट करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विविध आजी-माजी क्रिकेटपटू त्याच्या या निर्णयावर वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी सुद्धा आपला तर्क मांडला आहे.

काय म्हणाले संजय मांजरेकर? “विराट कोहलीला जेव्हा कधी आपल्या कॅप्टनशिपला धोका निर्माण होईल, असं वाटतं, तेव्हा तो कॅप्टनशिप सोडून देतो. त्याने फार कमी कालावधीत आयपीएल आणि त्यानंतर टी-20 ची कॅप्टनशिप सोडली. कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे. तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद त्याने खूप लवकर सोडले. माझ्या मते कर्णधारपद कायम स्वत:कडे टिकवण्याचा कोहलीचा प्रयत्न असतो. जेणेकरुन कोणी त्याला हटवणार नाही. पण जेव्हा कधी त्याला असं वाटतं, की आपलं कर्णधारपद धोक्यात आहे, तेव्हा कोहली कॅप्टनशिप सोडतो” असे संजय मांजरेकर म्हणाले.

रवी शास्त्री नसल्यामुळे कोहलीची अडचण वाढली “रवी शास्त्री हेड कोच पदावरुन गेल्यामुळे विराट कोहलीसाठी खूप गोष्टी बदलत चालल्या होत्या. त्यामुळे तो अस्वस्थ होता. अनिल कुंबळे कोच असतानाही, कोहली अस्वस्थ होता. पण शास्त्री आल्यानंतर त्याला हायस वाटलं. नवीन कोच राहुल द्रविड रवी शास्त्री सारखे नाहीयत. काही गोष्टींची विराटला कल्पना आली असेल. व्यक्तीगत पातळीवर विराटचा फॉर्मही फार चांगला नाहीय. त्यावरही सगळ्यांच लक्ष आहे. विराट मजबूत स्थितीमध्ये नाहीय. या गोष्टी क्रिकेटच्या जाणकारांच्या सहज लक्षात येणाऱ्या आहेत” असे संजय मांजेरकर म्हणाले.

(sanjay manjrekar explains reasons behind virat kohlis test captaincy resignation)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.