Virat Kohli च्या खराब फॉर्मवर गांगुलीच महत्त्वपूर्ण विधान, Asia Cup बद्दल काय म्हणाला? ते जाणून घ्या

विराट कोहली मागच्या बऱ्याच काळापासून खराब फॉर्मचा सामना करतोय. इंग्लंड दौऱ्यावरही तो धावांचा दुष्काळ संपवू शकला नाही. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

Virat Kohli च्या खराब फॉर्मवर गांगुलीच महत्त्वपूर्ण विधान, Asia Cup बद्दल काय म्हणाला? ते जाणून घ्या
Virat-SouravImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 10:35 AM

मुंबई: विराट कोहली मागच्या बऱ्याच काळापासून खराब फॉर्मचा सामना करतोय. इंग्लंड दौऱ्यावरही तो धावांचा दुष्काळ संपवू शकला नाही. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आराम देण्यात आला. कोहलीने इंग्लंड विरुद्ध दोन वनडे सामन्यात फक्त 33 धावा केल्या. कसोटी मध्ये दोन्ही डावात 31 धावा केल्या. त्याचा हाच फॉर्म टी 20 मध्येही कायम राहिला. त्याने 2 टी 20 सामन्यात एकूण 12 धावा केल्या.

सौरव गांगुलीची अपेक्षा

आता टीम इंडिया आशिया कपची तयारी करत आहे. या स्पर्धेद्वारे 33 वर्षीय कोहली मैदानावर पुनरागमन करणार आहे. आशिया कप स्पर्धेआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीच्या फॉर्मवरुन एक महत्त्वपूर्ण विधान केलय. आशिया कप मध्ये विराट कोहलीला त्याचा हरवलेला सूर सापडेल, अशी अपेक्षा सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे. “त्याला सराव करुं दे. त्याला सामना खेळूं दे. तो मोठा खेळाडू आहे. त्याने भरपूर धावा केल्या आहेत. मला अपेक्षा आहे, तो चांगलं पुनरागमन करेल. तो फक्त शतक झळकवू शकत नाहीय. आशिया कप मध्ये त्याला त्याचा फॉर्म परत मिळेल” असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. स्पोर्ट्स तकने हे वृत्त दिलय.

भारतीय संघात बरेच बदल

कोहलीची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. 2019 साली इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात कोहलीने त्याचं शेवटच शतक झळकावलं होतं. त्यानंतर कोहलीने अर्धशतक झळकावली. पण चाहत्यांना त्याच्याकडून शतकाची अपेक्षा आहे. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीवर सर्वांची नजर असेल. दुबई मध्ये आशिया कप स्पर्धा होणार आहे. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. मागच्यावर्षी पाकिस्तानने कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघावर मात केली होती. त्यानंतर भारतीय संघात बरेच बदल झाले आहेत. रवी शास्त्री आता कोच नाहीत. त्यांची जागा राहुल द्रविड यांनी घेतली आहे. कर्णधारही बदलला असून रोहित शर्मा आता कॅप्टन आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.